सातारा:श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार दि. 2 पासून सातारा जिल्ह्यात येत आहे. मंगळवार दि.2 रोजी लोणंद, बुधवार दि.3 रोजी तरडगाव गुरुवार दि. 4 रोजी फलटण तर शुक्रवार दि.5 रोजी बरड येथे मुक्काम होत आहे. त्यानिमित्ताने…
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ही परंपरा आजही अनेक शतके अबाधित आहे. वारकर्यांच्या दृष्टिने आषाढी वारीला आगळेवेगळे महत्त्व आहे. दरवर्षी आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात दरवर्षी पंढरपूर निवासी आपल्या उपास्य पांडुरंगाच्या दर्शनासाठी सतत जात राहणे म्हणजे पंढरीची वारी होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।्। असे सर्वांना आवाहन असते.
या वारीसाठी कोणतेही निमंत्रण नसते तसेच कुणी आग्रहही करत नाही. तरीही भक्तीरसात ओथंबून भरलेला लाखो वैष्णवांचा मेळा एकवटतो आणि दरवर्षी या पंढरीच्या वारी सोहळ्याचा एक नवा इतिहास रचतो.
पंढरपुरात पांडुरंग हात कंबरेवर ठेवून उभा आहे. आणि अवघे संत, अवघे वारकरी त्यांना भेटण्यासाठी पंढरीची वाट चालत आहेत. पंढरीची वाट हा आनंद आहे, हे सर्वस्व आहे. पंढरीची वाट चालताना अवघा जीव मोहरतो, एका एका पावलाने वाट सरत जाते तेंव्हा हृदयात होणारा आनंद काय वर्णावा. ये ग ये ग विठाबाई्। माझे पंढरीचे आई विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेल्या वारकर्यांनी पंढरीच्या वाटेवरची माती भाळी लावली आणि माहेरच्या ओढीने ज्ञानोबा-तुकाराम या भजनात पंढरीची वाट धरली, टाळ-मृदुंगाच्या साथीने भजनात रंग येत होता. मंगलचरण, परंपरेचे अभंग, आंधळा- पांगळा, जोगी, गुरुपरंपरेचे अभंग गात वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत होते.
पंढरपूर जवळ येईल तसे वारकर्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. संतांच्या संगतीने पंढरीची वाट लीलया पार होऊ लागते. राज्याच्या कानाकोपर्यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या निघतात.
या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी चालतात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रवास पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून होतो. पालखीचा पहिला मुक्काम पुणे पुढे सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव, वाखरी या ठिकाणी मुक्काम होऊन 18 दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी 12 जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा…
RELATED ARTICLES