वडूज: पडळ (ता. खटाव) येथील रहिवाशी व सुर्याचीवाडी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षीका रंगना श्रीमंत सानप यांना अखिल भारतीय प्रतिमा साहित्य संमेलन नवी दिल्ली या संस्थेतर्फे राष्ट्रीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील इंडिया गेटवरील आंध्रभवनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, नेपाळ येथील गुरु तनपाईजी, मिझोरामचे राज्यपाल अमलोक रतन कोहली, मानवाधिकार आयोगाचे ज्ञानेश्वर मुळे, मनोहर जाला, दादा इथाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संस्थेच्या वतीने साहित्य, शिक्षण व कला क्षेत्रातील निवडक लोकांचा गौरव केला. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड आदी राज्यातील मान्यवरांचा समावेश आहे. सौ. सानप या उपक्रमशील शिक्षीका म्हणून खटाव तालुक्यात सर्वपरिचीत आहेत. यापूर्वी त्यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे पंचायत समितीच्या सभापती कल्पना मोरे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, बाजार समितीचे सभापती रविंद्र सानप, युवा नेते संजीवभाऊ साळुंखे आदी मान्यवरांसह केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थांनी सौ. सानप यांचे अभिनंदन केले.
रंजना सानप यांना राष्ट्रीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार
RELATED ARTICLES