वाई : वाईतील मुख्य शिवाजी चौकात नगरपालिकेच्या जागेत अनधिकृत खुदाईमुळे पाणी पुरवठा करणार्या नगरपालिकेची मुख्य पाईपलाईनतुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने वाईतील सिद्धनाथ वाडी, दत्तनगर, प्राध्यापक कॉलनी या भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
शहराला पाणी पुरवठा करणार्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी लाखो लिटर वाया गेले आहे. त्यामुळे वाई शहरातील काही भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वाई नगरपालिकेच्या मुख्य चौकालागत पालिकेची मोकळा भूखंड असून यामध्ये खाजगी मालक अनधिकृत पणे जेसीबी च्या सहाय्याने भली मोठी चार खांदत होता परंतु ही बाबा पालिकेच्या कोणत्याही विभागाला कसलीही कल्पना नसावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
दरम्यान दुपारी चार वाजता जेसीबी ने चर खोदत असताना पाईप लाईन तुटली व त्यामधून पंधरा पुठाचे फवारे उडू लागण्याने बघ्यांची एकाच गर्दी उडाली. स्थानिक नागरिकांनी पालिकेला या घटनेबाबत माहिती देल्याने पालिकेचे कर्मचारी घटना स्थळी दाखल होवून त्वरित पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पालिका प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचे समजले. पालिकेच्या मुख्याधिकार्यांना ही बाब लक्षात आणू देता त्यांनी संबधित अनाधिकृत खुदाई करणार्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्याचे संकट लक्षात घेऊन तुटलेल्या पाईप लाईन ची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अन्यथा पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात महाभयंकर पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
अनधिकृत खुदाई; पाईपलाईन तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
RELATED ARTICLES