परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
वाई: वाई नगरपालिकेच्या सिद्धनाथवाडीतील नगरपालिकेच्या कचरा कुंडीला आगबुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागल्याने परिसत धुर पसरल्याने कचरा डेपोशेजारून जाणार्या- येणार्या नागरिकांना व परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या कचरा कुंडीत सिद्धनाथवाडीची यात्रा असल्याने कचरा कुंडीत कागदी, थर्माकोलची पात्रे प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणावर होता. आगीची भीषणता एवढी मोठी होती कि नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियातील ओल्या व सुक्या काचार्याच्या कुंड्या जाळून वितळून गेल्या.सतत हेतुपुस्कर लावलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आगीबरोबर धुराचे लोट या परिसरात उठत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
तरी कचरयाला आग लावणार्या समाज कंठ्कावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरीकामधून करण्यात येत आहे.
सिद्धनाथवाडीतील नगरपालिकेच्या कचरा कुंडीला आग
RELATED ARTICLES