भुईंज: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या इथेनॉलचा पेट्रोलियम कंपन्यांना मंगळवारपासून पुरवठा सुरू करण्यात आला. त्याचा प्रारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, मॉडर्न इंजिनिअरींगचे विनोद रणसिंग, स्वस्तिक कार्पोरेशनचे पंकज शहा, गुरूकेम एंटरप्रायझेसचे अर्जुन कवडे, ओझर्डेचे माजी सरपंच चंद्रकांत कदम यांच्या हस्ते व अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत टँकर पुजन करून करण्यात आला.
किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या दुरदृष्टीतुन कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेऊन साखरेसह पुरक उद्योगांची जोड देऊन सभासद शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होत आहे. कारखान्यास या हंगामाकरिता दोन कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपन्यांना या प्रकल्पातून निर्माण झालेल्या इथेनॉलचा पुरवठा करण्यात येणार आहे. कारखान्यावर सध्या प्रतिदिन एैंशी हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प असून तो पुर्ण क्षमतेने सुरू आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, इन्चार्ज सेक्रेटरी एन. एन. काळोखे, को-जन मॅनेजर डी. आर. वाघोले, असिस्टंट डिस्टीलरी इन्चार्ज यु. के. जाधव, शेखर भोसले-पाटील, हणमंतराव गायकवाड, किसनराव चिरगुटे, रामचंद्र वीरकर, शाहुराज भोसले-पाटील, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
किसन वीर कडून इथेनॉल पुरवठ्यास प्रारंभ
RELATED ARTICLES

