वाई : ज्येष्ठ साहित्यिक व किसनवीर महाविदयालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण ज्ञानदान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. प्रा. मुकुंद देवळालीकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी कै. मुकूंद देवळालीकर लिखित भिंत या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्मृतिगंध या प्रा. देवळालक यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य जगन्नाथ शिंदे, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी भूषविले.
बबन पोतदार यांनी देवळालीकर सरांच्या लेखन कौशल्याचे कौतुक करून प्रा. मुकुंद देवळालीकर यांचे साहित्य हे बहुआयामी होते. त्यांनी काव्याबरोबर कादंबरी, कथा आदी साहित्य निर्माण केले. असे सांगितले. जगन्नाथ शिंदे यांनी वाई परिसरातील लेखक म्हणून मुकुंद देवळालीकरांचा अभिमान वाटत असल्याचे सांगून कृष्णेच्या प्रवाह ज्याप्रमाणे दोन्ही काट समृध्द व संपन्न करत जातो त्याप्रमाणे प्रा. देवळालीकर यांचे साहित्य रसिकांचे जीवनविश्व संपन्न व समृध्द करते असे सांगितले. तसेच कृष्णातीर पाक्षिकातर्फे कै. मुकुंद देवळालीकर यांच्यावरील स्नेहांकितांनी लिहिलेल्या लेखांचा विशेषांक प्रकाशित करुन सर्व स्नेहांकितांनी आपले प्रेम व्यक्त करुन आदरांजली अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले.
कविसंमेलन असे साहित्यविषयक कार्यक्रम राबवून आपल्या वडिलांचे पुण्यस्मरण करीत आहे हे कौतुकास्पद आहे, असे अॅड. उमेश सणस म्हणाले.उपस्थित मान्यवरांमध्ये बाळासाहेब शिंदे, रत्नाकर शेट्टी, सतीश कुलकर्णी, विष्णू शिंदे, सी. डी. पवार, शिर्के यांनी प्रा. देवळालीकर यांच्याबद्दल मैत्रभाव व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आयोजीत काव्यसंमेलनात विष्णू शिंदे, सुरेखा पाटणे, शरदचंद्र चव्हाण, प्रमोद भिसे, मुजावर सरदार, सौ, पूनम ससाणे, चंद्रकांत जोगदंड, शिवाजी शिर्के, कादंबरी देखमुख, विजय शिर्के यांनी आपल्या कविता सादर केल्या. 16 जून या दिवशी जागतिक फादर्स डे यानिमित्ताने देवळालीकर यांची कन्या जयश्री कुलथे यांनी देवळालीकर सरांच्या माझे बाबा ही भावपूर्ण कवितेचे अभिवाचन केले. श्रीमती मीरा देवळालीकर यांनी प्रास्ताविक केले. सागर देवळालीकर, समीर देवळालीकर यांनी स्वागत केले. राजेश भोज यांनी सूत्रसंचलन केले. कविता शहाणे यांनी आभार मानले. कीर्तनकार चंद्रकांत उदावंत यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास भुईंजच्या माजी सरपंच अनुराधा भोसले, श्रीमती कामिनी पाटील, कृष्णात घाडगे, मुख्याध्यापक नागेश मोने, महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाईकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कै.प्रा.मुकुंद देवळालीकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी संपन्न
RELATED ARTICLES