वाई : सातारा जिल्हयात मागील आठ-दहा दिवस अतिवृष्टी आणि नद्यांना येणारा महापूर यांना तोंड देत आहे. वाई शहर देखील पाच – सहा दिवस पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यातून बाहेर पडत वाईतील जनजीवन सुरळीत होत आहे.
या सर्व आपत्कालीन परिस्थितीत नगरपालिकेची यंत्रणा सतत कार्यरत होती. एवढेच नव्हे तर त्यातून बाहेर पडताच सांगली शहरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरपरिषदेने अग्निशमन यंत्रणा व मैलागाडी वाहन आपल्या कर्मचार्यां सह पाठविली आहे. स्वच्छताविषयक कामात नगरपालिका प्रशासनाने आपली सामाजिक बांधलकी व संवेदनशीलता दाखवून देत प्रशासनातही माणूसकी असल्याचे सिध्द केले आहे.
सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोक अद्यापही पूराच्या पाण्यात अडकलेले असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुख्याधिकारी विद्या पोळ तसेच शिक्षक व नगरपालिका कर्मचारी यांचे मार्फत पूरग्रस्तांना मदत म्हणून तेल डबे, तांदूळ, मूग डाळ, मसाले, चादर, ब्लँककेट्स, सॅनिटरी नॅपकिन्सद, बिस्कीरट पुडे, बीसलेरी बॉटल्स व जीवनाश्यक उपयुक्त वस्तू एकत्र करुन सर्व साहीत्यासहीत 2 टेंम्पो सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले. नगरपरिषद कर्मचारी अधिकारी यांनी पूरग्रस्तांच्या सु:- दु:खात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मदत गोळा करुन पाठविण्यात आली.
वाई नगरपालिकेने पूरग्रस्तांसाठी आपत्कालीन यंत्रणा पाठविली
RELATED ARTICLES