वाई: महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी फिट इंडिया मूव्हमेंट मध्ये सहभागी होऊन स्वतःचे आरोग्य अबाधित ठेवावे व निरोगी भारत घडविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. येवले यांनी किसनवीर महाविद्यालयात आयोजित केलेल्या दहा हजार पावले चालण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुध्दृड व सक्षम विद्यार्थी तसेच नागरीकच देशाचे भवितव्य उज्ज्वल घडवू शकतो यासाठी ही मोहीम सुरू केली आहे, भारताची बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू ने नुकतेच जागतिक स्तरावर सुवर्ण पदक मिळवून आपल्या देशाला सन्मान मिळवून दिला आहे असे ते म्हणाले. सुरवातीला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोहीमेचे ऊद्घाटन मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानात सुमारे 10000 पावले चालण्याचा सराव केला.
प्रा. समीर पवार यांनी सर्वांना शपथ दिली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील क्रिडा विभागाचे प्रा. समीर पवार, प्रा. मनोज शिंदे व प्रा. गजानन जाधव यांनी केले. श्री. धनंजय घोडके यांची विशेष उपस्थिती होती.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा
RELATED ARTICLES