Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीपर्यावरणाचा समतोल राखण्यास निरपेक्ष भावनेने केलेले काम स्तुतीस पात्र ठरते : पोलिस...

पर्यावरणाचा समतोल राखण्यास निरपेक्ष भावनेने केलेले काम स्तुतीस पात्र ठरते : पोलिस अधीक्षक सातपुते

सातारा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निरपेक्षतेची भावना असावी लागते.वृक्ष महत्वपुर्ण कार्य करीत असल्याने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन करणे महत्वाचे आहे.व्यक्तिशः अथवा सामुहिक कार्य सातत्याने जे करतात. तेच पात्र ठरतात. खरोखरच,स्तुत्य असा उपक्रम आहे.असे गौरवोद्गार पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.
ड्रोन्गो व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गौरव समारंभ येथील स्वयंवर सभागृहात संपन्न झाला.तेव्हा पो.अधिक्षक सातपुते यांच्या हस्ते वृक्षप्रेमी संस्थाना गौरविण्यात आले.तेव्हा त्या मार्गदर्शन करीत होत्या.अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक भारतसिह हाडा होते.यावेळी सिंधुदुर्ग सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणीक उपस्थित होते.
पो.अधिक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, वड, कडुलिंब यासारखे वृक्ष स्वतःच कल्पवृक्ष असल्याने संवर्धन करणे काळाची गरज आहे.झाड ,पाणी व ऑक्सिजन यांच्या अभावामुळे मानव संकटात सापडला आहे.दुष्टचक्र वार्मिंगचे कालचक्र सर्व स्तरात पहायला मिळत आहे.तेव्हा सकारात्मक वाटचाल व जनजागृती करून पर्यावरणाचा समतोल राखुया.
वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी,मानव – वन्यजीव संघर्ष या विषयावर स्लाईड-शो यांच्या माध्यमातुन सखोल असे मार्गदर्शन केले.अलीकडे संघर्ष वाढलेला आहे.जंगलाचे क्षेत्र आहे तेवढेच आहे.पूर्वीसारखेच जंगलात पाणी,अन्न व आहार- विहार वन्यप्राणी करतात.मात्र,त्यास सहजतेने नागरीवस्तीतील कुत्र्यावर हल्ला करून सहजतेने अन्न मिळवत असल्याने त्याचा वावर वाढलेला आहे.तो मानवास काहीही करीत नाही.तेव्हा मानवाने कचरा केल्याने कुत्र्याची संख्या वाढत आहे.आणि त्या कुत्र्यांची शिकार त्यांना सहजतेने अन्न म्हणून मिळत असल्याने तो जंगलात भटकायचं जास्त कष्ट घेत नाही.वन्यप्राणी हे मानवप्राण्याप्रमाणे विहार करत असतात. त्यांची संख्याही वाढत आहे.त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रांतात अन्नासाठी जा-ये करीत असतात.संविधानाने आस्था व संरक्षण दिल्याने मानवाने तक्रारी न करता स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना आखावी.जमिनीमध्ये जे पीक घेत असतो,त्याचीही काळजी मानावनेच घ्यायची आहे.पुराणिक यांनी अनेक उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण असे प्रबोधन केले.
मानवास उपयुक्त साहित्य हे झाडापासूनच मिळत असते.तेव्हा संवर्धन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.असे विचार उपवनसंरक्षक भारतसिह हाडा यांनीही विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. यावेळी कुरनेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपसह स्पंदन,खिंडीतील गणपती,झुंजार कॉलनी, नेचर पिलर्स ग्रुप,मोरगाव ग्रुप,युनायटेड वेस्टर्न बँक-गृहनिर्माण संस्था,हरिओम किल्ला ग्रुप,भाऊंची सावली,कचरा वेचक संघ,भवानी मंडळ तसेच वनक्षेत्र – महाबळेश्वर,मेढा,कराड व सातारा तसेच विशेष पुरस्कार सुभाष पुराणिक व भारत भोसले यांचा पो.अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमास असंख्य संस्था,कार्यकर्ते ,नागरिक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सुनील भोईटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शैलेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.ऍड.सचिन तिरोडकर यांनी आभारप्रदर्शन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular