सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणुक पार पडून निकाल लागलेला आहे. या निकालाचे विश्लेषण तज्ञ मंडळी आपल्या नजरेने करत आहेत. पण सुज्ञ मतदारांनी मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी मतदान केले. त्याच बरोबर उमेदवार पसंद नसल्याने 9227 मतदारांनी नोटाला मतदान करून आपल्या नाराजीचा सुर जनते पर्यंत पोहचविण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या नोटाबाबतच्या मतदानाची जबाबदारी कोणाची? याची आता प्रमुख सक्षम उमेदवारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी कोणाच्या सल्ल्याची गरज उरली नाही.
सातारा लोकसभा मतदार संघात 1952 पासून निवडणुका होत आहेत. पूर्वी राजकीय पक्षाचे धोरण व त्यांचा प्रामाणिकपणा पाहून जे उमेदवार उभे असतील त्यांना 80 ते 90 टक्के मतदार पसंती देत होते. ही परंपरा 50 वर्षे राहिली होती. त्यानंतर राजकीय पक्षाची वाढ झाल्यामुळे उमेदवारांचीही संख्या वाढली. त्यामुळे प्रत्येक गावात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचारांना जाणे अशक्य ठरले. तरी सुद्धा निवडणुक या पक्षाभोवती फिरत होत्या. सध्या उमेदवार पाहून मतदान करण्याचे ट्रेन आला आहे. यंदाची निवडणुक ही वैशिष्ट्य पूर्ण ठरली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे श्री. छ. उदयनराजे भोसले, सेना भाजपचे नरेंद्र आण्णासाहेब पाटील व वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे यांच्या सह 9 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. त्यापैकी 6 उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मतदान पडले आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये नकारार्थी नव्हे, तर उमेदवार पसंद नसल्याचे दाखवून देण्यासाठी बटण दाबले आहे. खाजगीमध्ये चर्चा करून पुन्हा राजकीय पक्षाच्या नेत्यांना मतदान करणारांना ही मोठी चपराक ठरली आश्न
काही गावांमध्ये उमेदवार फिरकले नाहीत. प्रचारक फिरले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून संपर्क तोडला आहे. विकास कामांबाबत दुर्लक्ष झाले आहे. तरी सुद्धा लोकशाही बळकटीसाठी काहींनी मतदान केले आहे. याचे खर म्हणजे सर्वत्र कौतुक होत आहे, ही समाधानाची बाब आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या वाई, कोरेगाव, कराड (उत्तर) (दक्षिण) व सातारा विधानसभा मतदार संघात नोटाला मतदान करण्यामध्ये अनेकांनी पुढाकार घेतला आहे. 1500 ते 2000 मतदारांनी नोटाला मतदान करून सोशल मिडिया, प्रसार माध्यम आणि प्रचारकांच्या भुल थापेला बळी पडले नाहीत. हेच यातून दिसून आलेले आहे. सातारा जावलीकरांनी तर सर्वाधिक नोटाला मतदान करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे. 9 उमेदवारांना 12,6,528 एवढे मतदान झाले. त्यापैकी विजयी उमेदवार श्री. छ. भोसले यांना 5,79,026 मत मिळाली आहेत. याचा अर्थ 4,52,444 व नोटाचे 9,227 म्हणजेच 4,61,671 मतदारांनी त्यांना नाकारले आहे. हे स्पष्ट झाले आहे. राजकारण करताना पक्षीय निष्ठेपेक्षा व्यक्तीगत निष्ठेला महत्व आल्यामुळे हत्तीच्या गोष्टींमधील आंधळ्या व्यक्तीला हत्तीचा पाय खांबासारखा दिसतो, कान सुपासारखे दिसतात तर, शेपटी रस्सीसारखी वाटते. हे स्वाभाविक आहे. त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. परंतु कोट्यावधी रूपये खर्च करूनही ज्या मतदारांनी मतदान केले नाही. त्यांच्याबाबत आता निवडणूक आयोगानेही भूमिका ठरविणे गरजेचे बनले आहे. त्या अर्थाने ज्यांनी नोटाला मतदान केले आहे किंवा योग्य वाटलेल्या राजकीय पक्षाला मतदान केले आहे. ते कौतुकास पात्र आहेत. आता लोकसभेत उभे असलेल्या प्रमुख तीन पक्षाच्या उमेदवारांनीच या गोष्टीचे आत्मचिंतन करावे. कारण जब आग ही लगी नही तो, धुवाँ कहा से निकलेगा याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात नोटाबाबत जबाबदारी कोणाची?
RELATED ARTICLES