औंधः मागील महिन्यातील बारा जानेवारी रोजी औंधचे कुस्ती मैदान संपवून कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलाकडे परत निघालेल्या पाच पैलवानांवर भीषण अपघातामुळे घाला घातल्याने अवघा पश्चिम महाराष्ट्र हादरून गेला होता. यामुळे पैलवानांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला .त्या कुटुंबियांना सावरणे हे आपले आद्य कर्तव्य समजून औंध येथील समाजसेवी युवक, ग्रामस्थांनी मागील पंधरा दिवसांमध्ये
सुमारे सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा करुन समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला आहे. यामधील एक लाख रुपये चार पैलवानांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केेेले.
मागील महिन्यातील दि.बारा जानेवारी ची शुक्रवारची रात्र व शनिवारची पहाट ही क्रांती क्रिडा संकुलातील पाच पैलवांनासाठी काळ रात्र ठरली .औंध येथील कुस्ती मैदान संपवून व काही मित्रमंडळीकडे जेवण करून कुंडलकडे परत निघालेल्या पैलवानांच्या जीपगाडीला वांगी गावानजीक भीषण अपघात झाला यामध्ये शुभम घारगे(सोहोली),विजय शिंदे(रामापूर),आकाश देसाई(काले),सौरभ माने(मालखेड),अविनाश गायकवाड(फुफीरे)व ट्रँक्स ड्रायव्हरचा जागीच म्रूत्यु झाला होता. तरुण व होतकरू पैलवानांच्या आकस्मिक मृत्युमुळे त्यांच्या. कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. यातील पैलवानांच्या कुटुंबियांनी सर्वस्व पणाला लावून आपली मुले कुंडल येथे प्रशिक्षणासाठी पाठविली होती.पण काळाने घातल्यामुळे यातील रामापूर येथील विजय शिंदे यांच्या कुटुंबियांकडे वीस हजार रुपये, काले येथील आकाश देसाई यांच्या कुटुंबियांकडे पंचवीस हजार रुपये, मालखेड येथील सौरभ माने यांच्या कुटुंबियांकडे पंचवीस हजार रुपये, फुपिरे येथील अविनाश गायकवाड यांच्या कुटुंबियांकडे पंचवीस हजार रुपये त्याठिकाणी जाऊन औंध येथील युवक व ग्रामस्थांनी सुपूर्द केले.दरम्यान यातील पंचवीस हजार रुपयांचीआकस्मिक मृत्यु पावलेल्या औंध गावचे कोतवाल मनोज भोकरे यांच्या निराधार पत्नीला पंचवीस हजार रूपयांची मदत करण्यात आली.