कराडः गांवोगांवी होणार्या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह या द्वारे केला जातो, हिच परंपरा पाडळी (निनाम) ता.जि.सातारा गावाने अखंड चालू ठेवली असून, या गांवाने वारकरी सांप्रदायाचा वारसा जपण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते मौजे पाडळी (निनाम) ता.जि.सातारा येथील विठ्ठल मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सह्याद्रि कारखान्याचे संचालक पैलवान संजय थोरात, जगदेवराव जाधव, माधवराव जाधव, सरपंच जीवन जाधव, ह.भ.प.आप्पा महाराज, बापूराव महाडीक, माजी सरपंच बाळू जाधव, गजानन जाधव, शामराव जाधव, व्यासपीठ चालक ह.भ.प.विजय महाराज, अशोक जाधव, महादेव महाडीक, शामराव पोतदार व ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
आ.बाळासाहेब पाटील यांनी पाडळी येथील पारायण सोहळ्यास दिली सदिच्छा भेट
RELATED ARTICLES