म्हासुर्णे प्रतिनिधी (तुषार माने)): मल्हारपेठ-पंढरपुर महामार्गातील रायगाव फाटा म्हासुर्णे चितळी या पंधरा किलोमीटर अंतरामध्ये हजारो खड्डे व साईट पट्टयाची दुरावस्था झाल्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे.
तरी या रस्त्याबाबत काही दिवसापुर्वी घोषणा होउन हे काम अजुन सुरु झाले नाही.त्यामुळे याभागातील जनतेची प्रतिक्षा आज ही कायम आहे.
हा रस्ता दुष्काळी तालुक्यातून जाणार असल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र आज पर्यत प्रत्यक्षात काम सुरु झाले नाही. तालुक्यांच्या तुलनेने आज खटाव तालुक्यातील या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामध्ये रायगाव फाटा ते चोराडे म्हासुर्णे चितळी मराठानगर मायणी या गावातून जाणाऱ्या या मार्गावर शेकडो खड्डे पडलेले आहेत तसेच या मार्गावरील साईटपट्टया पुर्णपणे खचलेल्या असुन या मार्गाला छेद करून उरमोडी योजनांचे पाठ गेले आहेत या पाटाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस अतिशय खराब रस्ता झाल्यामुळे वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनाला नेमके वाहन कसे चालवायचे याचा अंदाज येत नाही त्यामुळे हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असल्याचे दिसत आहेत.
तरी खटाव तालुक्यात रस्त्यांची अवस्था वेगवेगळी का असा प्रश्न पडत आहे . त्यामुळे खटाव तालुक्याला हक्काचा आमदार नसल्यामुळे रस्त्याची ही अवस्था तर झाली नसावी का ? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला
आहे,
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खटाव तालुक्यातील हद्दींच्या रस्त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी व खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात टाळावे अशी मागणी
खटाव तालुक्यातील नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.
फोटो :- मल्हारपेठ-पंढरपुर रस्ता खटाव तालुक्यातील परिसरात खड्डेमय व चिखलग्रस्त(छाया-तुषार माने म्हासुर्णे)
प्रतिक्रिया :
मल्हारपेठ पंढरपुर रस्त्याच्या बाबतीत शासनाची उदानसिनता दिसुन येत आहे.
या रस्त्यावर पंढरपुर ते मायणी पर्यंतच रस्त्याचे काम सुरु आहे.
तरी इथुन पुढचा रस्त्याची अकक्षश: चाळण झालेली आहे.तरी सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पोपट माने
ग्रामस्थ म्हासुर्णे
प्रतिक्रिया:
या मार्गावरुन पायी दिंडी सोहळा जात असतो त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
सध्या या रस्त्याच्याकडेच्या साईट पट्टयांची झालेली दुरावस्था अतिशय भयानक आहे.
त्यामुळे याचे रस्त्याचे काम त्वरित करावे अशी आम्हा ग्रामस्थांची आहे.
सचिन शिंदे
ग्रामस्थ म्हासुर्णे