म्हसवड : दिडवाघावाडी ता माण येथील ग्रामसेवक विजय काटकर यांनी गावात सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कामात प्रत्यक्ष सहभाग तर घेतला आहेच शिवाय या कामास आर्थिक मदतही केली आहे.त्यांच्या या कामाचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे मत गावचे सरपंच बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केले.
माण सारख्या पाचवीला दुष्काळ पुजलेल्या तालुक्यात दुष्काळाला हद्दपार कऱण्यासाठी पाणी फाऊंडेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तालुक्यातील अनेक गावांत लोक सकाळी लवकर उठुन श्रमदान करीत आहेत.याकामासाठी आर्थिक मदतीची गरजही भागात आहे.याठिकाणी सुरू असणार्या जे सी बी सारख्या वाहनांना इंधनासाठी पैश्याची गरज भासत आहे.दिडवाघवाडी येथे गावचे ग्रामसेवक विजय काटकर हे स्वतः रोज सकाळी श्रमदानासाठी येत आहेत शिवाय त्यांनी आर्थिक मदत म्हणून धनादेश पाणी फाऊंडेशन समितीला दिला आहे.त्यांच्याप्रमाणे अणेकजन अशी मदत करीत आहेत.
गावामध्ये पाणी फाऊंडेशनचे काम चांगल्या प्रकारे सूरु आहे.परंतु यामध्ये आणखी वाढ केल्यास त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.यासाठी शनिवार 11 मे रोनी महाश्रमदान आयोजित केले असून लोकांनी यामधे मोठ्या प्रमाणात श्रमदान तसेच आर्थिकदान व वास्तुरूपी दान करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन पाणी फाऊंडेशन समितीने केले आहे.यावेळी सरपंच बाळासाहेब काळे,उपसरपंच अमोल रासकर,महेश दिडवाघ,प्रभाकर दिडवाघ,आपा दिडवाघ,वैभव दिडवाघ,पोपट दिडवाघ,पोलीस पाटील संतोष सरगर,आर जे केराबाई दिडवाघ,शंकर दिडवाघ,धनाजी नरबट आदी मान्यवर उपस्थित होते.
दिडवाघावाडीच्या ग्रामसेवकाची पाणी फौंडेशनच्या कामास आर्थिक मदत
RELATED ARTICLES