म्हसवडः माण तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेणार्या गावांना आर्थिक साहाय्य करणे व श्रमदान करणे असे अहिंसा पतसंस्थेचे समीकरणच झाले आहे.
माणचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी जलसंधारणाची कामे गरजेची असून ती गावांच्या एकीतून होत आहेत.त्यास साथ म्हणून अहिंसा पतसंस्था ही या कामास हातभार लावत आहे. आत्तापर्यंत दिडवाघवाडी ,गोंदवले खुर्द,पानवन येथे जाऊन संस्थेचे संचालक व कर्मचारी असे मिळून श्रमदान केले व अर्थसहाय्य ही केले आहे.
पानवन येथे जलसैनिकांपुढे बोलताना संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी म्हनाले की,पूर्वी पासून आंदोलनात पुढे असणारे पानवन गांव हे वॉटर कप स्पर्धेत ही यशस्वी होईल. गावची एकी व कामाचा दर्जा पाहता पानवन हे गांव भविष्यात पाणीवान होईल याची खात्री आहे.
सध्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे.पशुधनही वाचवायचे आहे.यासाठी जलसंधारणाच्या चळवळीत माण तालुका अग्रेसर राहील. व त्यातूनच पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास ही नितिन दोशी यांनी दिला. याप्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सरतापे, प्रितम शहा,तेजस व्होरा,तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
पानवन हे पाणीवान गांव होईलः नितिन दोशी
RELATED ARTICLES