कराडः पानवण ता.माण जि. सातारा या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून जलसंधारणाचे काम गतीने सुरु केले आहे येथील ग्रामस्थ उसतोडीसाठी प्रतिवर्षी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडीच्या कामासाठी येतात यंदा यागावांमध्ये अति दुष्काळाचे संकट असून वाहतूक मुकादम व ऊस तोडणी कामगार यांच्या मागणीनुसार सामाजिक बांधीलकिच्या जाणिवेतून कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याचे जे सी बी मशीन उपलब्ध करून दिले .सदर मशीनच्या साहाय्याने डीप सी सी टी काढणे,शोषखड्डे काढणे, नालाबंडिंग साठी डबर भरणे तसेच विहीर पुनर्भरनसाठी खड्डे व चर काढणे इत्यादी कामे करण्यात आली.निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटकाळात आ. बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ आ. बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाला धन्यवाद देत आहेत .
पानवण पाणीदार करण्यासाठी सह्याद्रीचा मदतीचा हात
RELATED ARTICLES