सातारा (एकनाथ थोरात) : दुष्काळी माण तालुक्यातील सुमारे 3 हजार 500 लोकसंख्या असलेल्या पानवन गावाने यावर्षी पाणी फौंडेशनमध्ये उस्फुर्त सहभाग घेवून दुष्काळाशी दोन हात करुन लढा सुरुच ठेवला आहे. गावची पाणी टंचाई संपूष्ठात यावी व गावाला दुष्काळाचा लागलेला कलंक पुसून टाकावा म्हणून गावातील 800 लोक श्रमदानात सहभागी झाले आहेत. पाणी फौंडेशनतर्फे दिलेले उदिष्ठ या गावाने पूर्ण केले आहे.
जलदुत म्हणून पानवन गावासाठी रात्र दिवस झटत असलेले दादासाहेब नरळे, विनोद शिंदे, दादासाहेब शिंदे, यांची भूमिका महत्वाची ठरु लागली आहे.
श्रमदानासाठी सहभागी झालेले प्रत्येक व्यक्तीला सकाळी नाष्टा, चहापाण्याची सोय करण्यात आली असून एक किलो गहू व अर्धा किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीला दिला जात आहे. महिलांचा सहभाग 75 टक्के श्रमदानात लाभत आहे. शाळेचे विद्यार्थीही श्रमदानात पुढे राहीले आहेत. विशेष म्हणजे झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या प्रसिध्द मालिकेतील कलाकार राणा व अंजली यांनी पानवन गावात येवून ग्रामस्थांबरोबर महाश्रमदानात सहभाग नोंदवला होता. पाणी फौंडेशनच्या तिसर्या पर्वाला खर्या अर्थाने माण तालुक्यात बळकटी आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण तालुक्यात नुकताच दुष्काळी दौरा केला. यावेळी तालुक्यातील पाणी फौंडेशनमध्ये सहभाग घेतलेल्या गावासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जमा करुन दुष्काळी कामासाठी दिला आहे. आ. जयकुमार गोरे यांनीही मदत केली आहे. पानवन गावाने गाव पाणीदार करण्यासाठी व राज्याचा पुरस्कार मिळवण्याच्या दृष्टीने पाणी फौंडेशनच्यावतीने डीप सीसीटीचे दिलेले 16 हजाराचे टार्गेट पैकी 14 पूर्ण केले आहे. 1 लाख 80 हजार घ. मि. यंत्राने कामापैकी 1 लाख 60 हजार घ. मि. काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी पॅकलॅनचा वापर करण्यात आला. शोषखड्ड्याचे 70 टार्गेट पूर्ण, माती परिश्रण टार्गेट पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राजकीय गट, तट बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फौंडेशनमध्ये पानवन गावाने हिरीरीने सहभाग घेवून तालुक्यात यावर्षी उल्लेखनीय काम केले आहे. माण तालुक्यात पावसाने प्रमाण दरवर्षी अत्यल्पच राहीले आहे. अनेक गावाना टँकरवर अवलंबून रहावे लगले आहे. ही परिस्थिती गेल्या तीन वर्षात बदलून अनेक गावात जलक्रांती झाली आहे. टँकरची संख्या घटू लागली आहे. शासनाचा लाखो रुपयाचा टँकरवरील खर्च कमी होत गेला आहे. चित्रपट अभिनेता अमिर खान व किरण राव यांनी मनापासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळ हटविण्यासाठी केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे हे मात्र निश्चित.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकारांचे पानवनला महाश्रमदान
RELATED ARTICLES