परळीः जनमाणसांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी मोबाईलचे महत्व मोठे आहे. परंतु ग्रामीण भागातील नेटवर्कचा विषय हा अजूनही सुधारलेला नाही. गेल्या 4 दिवसंपासून आयडिया कंपनीचे परळी खोर्यात पोहोचत नसल्याने काही गावे संपर्क हीन झाली आहेत.
मोबाईल म्हणजे एक व्यसन ही सध्याची परिस्थिती जरी आली तरी ग्रामीण भागात हाच मोबाईल मुबंई तील असलेले चाकरमानी आपल्या घरच्यांशी 4 शब्द बोलण्यासाठी वापर करतात. या भागात आयडिया, बीएसएनएल, व्होडाफोन या कंपनीचे नेटवर्क असल्याने बहुतांश हे आयडिया कार्ड वापरतात त्यात नेटवर्क प्रॉब्लेम अचानक आल्यानी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परळी खोरे आऊट ऑफ कव्हरेज, आयडिया नेटवर्क 4 दिवसांपासून बंद
RELATED ARTICLES

