Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीउसाच्या पाचट पेटविल्याने पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर

उसाच्या पाचट पेटविल्याने पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर

वाईः जागतिक पातळीवर पर्यावरण प्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जागतिक तापमान वाढ व हवेतील कार्बनचे प्रमाण यामुळे मोठया नैसर्गिक आपत्तींना तोंड दयावे लागत आहे. हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना श्‍वसनाचे गंभीर आजार होताना दिसत आहेत. उत्तर भारतात धानची शेत शेतकर्‍यांनी पेटविल्याने हवेच्या प्रदुषणाची पातळी खूप वाढली आहे. यामुळे न्यायालयाने शेत पेटविण्यास बंदी घातलीआहे. त्याचप्रमाणे वाई तालुक्यासह सातारा जिल्हयात ही उसाचा उत्पादक पटट्ा मोठा आहे.साखर कारखाने सुरू झाल्यानतंर ऊस तोडणीला वेग येत असतो. सध्या वाई तालुक्यात ऊस कापून गेल्यानतंर शेतकरीस र्‍हास पाचट पेटविताना दिसत आहेत. यामुळे धुराचे लोट हवेत झेपावताना दिसत आहेत.
शेतकरी हे पारंपरीक गैरसमजूतीतून उस कापणी झाल्यानतंर सर्रास पाचट पेटविताना दिसत आहेत. यामध्ये त्यांना तात्पुरता फायदा दिसत असला तरी यांचे दुरोगामी दुष्परीणाम मोठया प्रमाणावर आहेत, याचे गांभीर्य शेतकर्‍यांना दिसत नाहीत. पाचट पेटविल्यामुळे हवेचे प्रदुषण होतेच त्याचबरोबर जमीनीवरही याचे दुष्परिणाम होताना दिसत आहेत. पाचट पेटविल्याने शेतजमीन भाजली जाते यामुळे जमितील जीवाश्म नष्ट होत असते. यामुळे जमिनीचा पोत कमी होऊन कालांतराने जमिन नापिक होण्याचा धोका संभवतो. याउलट पाचट न पेटविल्यास उसच्या पाचटीचे कम्पोंस्ट खत तयार होते. पाचटीमुळे जमिनीत ओलावा धरून ठेवल्याने पाणी कमी लागते. जीवाश्म वाढीस मदत झाल्याने जमिनीचा पोत सुधारतो व सुपिक होण्यास मदत होते. याविषयी जनजागृती करणे काळाची गरज असून कृषि विभागाने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
पाण्याची बचत व सेंेद्रीय खताची निर्मिती
शेेतकर्‍यांनी उसाची पाचट पेटवू नये, उस कापणी झाल्यानतंर कुटट्ी मशीन फिरवून सुपर फॉस्पेट टाकल्यास पावसाळयात पाचट कूजून सेंेद्रीय खत तयार होते. यामुळे शेेतकर्‍यांचा खतासाठी होणारा हजारो रूपयांचा खर्च वाचून उसाचे उत्पादन वाढते. तसेच तीन पाण्यामध्ये एक पाण्याची बचत होते. व शेत जमिन सूपिक होण्यास मदत होते. -विकास सावंत प्रयोगशील शेतकरी यशवंतनगर
शेतकरी गैरसमजूतीतून ऊस, गहू तसेच इतर पिकांची कापणी झाल्यावर अनावश्यक पाचट, पिकाचे खोडवे पेटवत असतात. यामुळ हवेचे प्रदुषणाबरोबर जमिनीवरही याचे दुष्परिणाम होत असतात जमिन भाजल्याने जीवश्म नष्ट होवून जमिन नापिक होण्याचा धोका असतो. याउलट न पेटवल्यास कूजून सेंद्रीय खत होऊन जमिनीत ओलावा जास्त दिवस राहून पाणी कमी लागते तसेच जमिन सूपिक होण्यास मदत होते. -एच डी धुमाळ, वाई तालुका कृषि अधिकारी

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular