Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपाटणला आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न

पाटणला आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न

सातारा : देशातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख असून विकासाच्या केंद्रीकरणातून महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे. दि. 01 मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस असून आज महाराष्ट्र राज्य निर्मितीचा 59 वा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपुर्ण महाराष्ट्र राज्यात संपन्न होत आहे. ज्या 105 हुतात्मांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या 105 हुतात्मांना विनम्र अभिवादन करुन महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्यात आणला त्यामध्ये पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यामध्ये अग्रभागी होते. 105 हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्‍यां या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे,नागरिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त दि.01 मे रोजीचे ध्वजारोहण पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रंसगी पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांच्यासह स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक, पाटण मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुकास्तरीय सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,ज्या 105 हुताम्यांच्या योगदानामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असून पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने या 105 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. गेली 59 वर्षे राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील जनतेकरीता लोककल्याण योजना राबवित आहे.आपले महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतीशील राज्य व्हावे,राज्यातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात याकरीता राज्य शासनाकडून कसोसीने प्रयत्न सुरु असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी गेली चार वर्षे चांगले योगदान देवून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.आज आपले महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रामध्ये प्रगतीची विविध शिखरे पादाक्रांत करीत आहे. याचा अभिमान वाटतो.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर प्रयत्नातून राज्याच्या विविध भागामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत.शासनाच्या विविध योजना सामान्य घटकांपर्यंत पोहचविण्याकरीता शासनामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपल्या मतदारसंघांचा आमदार या नात्याने राज्याच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्याकरीता मी गेली चार वर्षे कसोशीने प्रयत्न केला असून हा प्रयत्न भविष्यातही असाच सुरु राहणार आहे. सामान्या घटकांचा विकास करणे ही आपली जबाबदारी असून विकासाचे उदीष्ठ पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे यामध्ये तालुकास्तरीय सर्व जनतेने, शासकीय अधिकारी यांनी मोठे योगदान दिले आहे ते पुढेही दयावे असे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी आवाहन करीत पाटण मतदारसंघातील तमाम जनतेला त्यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचे आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular