Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीसंविधानाची प्रत जाळणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. -: प्रा. रविंद्र सोनावले.

संविधानाची प्रत जाळणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. -: प्रा. रविंद्र सोनावले.

पाटण : – भारतीय देश हा सविधानावर चालत आहे त्यामुळे देशात लोकशही टीकुन आहे मात्र काही देश द्रोहांनी जंतर – मतंर दिल्ली येथे  भारतीय सविधानाची प्रत जाळली त्याच्यांवर देशद्रोहाचाच गून्हा  दाखल करा अन्याथा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव रविंद्र सोनावले यांनी  पाटण येथे दीला.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंंडिया युथ आघाडी .रोजगार आघाडी .बहुजन आघाडी .महीला आघाडी शाखा पाटण तालुक्याच्या वतिने सविधान सन्मान मोर्चा व विविध मागण्यांसाठी येथील तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते यावेळी  डाँ .बाबासाहेब आबेंडकर विचारमंचचे अध्यक्ष आप्पासाहेब मगरे, भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष मिलींद काबंळे, बबन सुतार,  सातारा जिल्हा रोजगार विभागाचे अध्यक्ष सचिन काबंळे, कीशोर भिगार्डे, विजय थोरवडे, भानुदास सावंत, ब.सा.पा.चे तालुका अध्यक्ष  शिवाजी काबंळे, पाटण तालुका अध्यक्ष प्राणलाल माने, पाटण शहर अध्यक्ष दीपक भोळे, युथ आघाडीचे अध्यक्ष आनंदा काबंळे,  नथुराम रोकडे,लक्ष्मण काबंळे, नदंकुमार देवकांत, दीपक गायकवाड, अनिल माने, चद्रंकात काबंळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

यावेळी सोनावले पुढे म्हणाले की धावडे येथील राजकुमार रोकडे या यूवकाचा खुन करुन मारेकरी मोकाट आहेत त्यांचेवर ३०२ गुन्हा दाखल करा पाटण येथील इनामी जमिनिवर शासन व काही शिक्षण संस्था व धनदांंडगे यांनी कब्जा केला आहे. त्यांचेवर कारवाई करुन त्या जमिनी मुळ मालकाना परत द्या अडुळ येथील मागासवर्गीय अमरावती चव्हाण या महीलेचा एल. अन्डँ. टी. च्या कर्मचार्यानी खुन केला आहे. मात्र ते आज ही मोकाट आहेत त्याचेवर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ का  करीत आहेत. ते कळत नाही असे ते म्हणाले. यावेळी विजय थोरवडे म्हणालेकि पाटण तालुक्यात अति पाउस पडला आहे त्या मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने ओला दुष्काळजाहीर करुन  त्या शेतीचे पंचनामे तातडीने करावे. तसेच मल्हारपेठ येथील घडलेल्या घटणेत कृषी अधीकार्यानी शेतकर्यांचेवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तातडीने मागे घ्या.

यावेळी प्राणलाल माणे म्हणाले की संनातन सस्था ही देशात जाती जाती मध्ये तेड निर्मान करीत आहे त्या मुळे राज्यात तनावाचे वातावरण आहे. या संस्थेवर कारवाई करावी. अशी मागणि करुन ते म्हणाले कि बहुले येथील एका दलीत अल्पवयीन विध्यार्थीनीचा विनयभंग करणार्या नराधमास कठोर शासन झाले पाहीजे. अन्यथा  तिव्र अंदोलन करु असा ईशारा त्यानी शेवटी दीला. उपस्थिताचे स्वागत आनंदा काबंळे यांनी केले तर दीपक भोळे यांनी आभार मानले या वेळी महीला व कार्यकरते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular