पाटण/प्रतिनिधी- पोलिस पाटील हे पोलिस व जनतेमधील दुवा असून पोलिस पाटील हे मानाचे पद आहे. ते कोणाचे खाजगी पगारी नोकर नाहित. तुम्हाला मिळणाऱ्या मानसन्मानाला भुलून जाऊ नका तुमच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिस पाटलांनी राजकीय गटातटाचं राजकारणं न करता आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे प्रतिपादन पाटण पोलिस उपविभागीय अधिकारी अंगद जाधववर यांनी केले.
पोलिस पाटील दिनाचे अवचित्य साधून पाटण उपविभागीय मान्यवरांचा व सेवा निवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार समारंभ व पोलिस पाटील ओळखपत्र वितरण समारंभ नाडे नवारस्ता येथिल कृष्णलिला गार्डन कार्यालय येथे पार पडला. यावेळी पाटण उपविभागिय कार्यालयाचे उपविभागिय अधिकारी श्रीरंग तांबे, मल्हारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिगंबर अतिग्रे, स. फौजदार संतोष कोळी, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, पोलिस पाटील राहुल सत्रे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर बोलत असताना म्हणाले की जनता व पोलिस यांचे संबंध योग्य प्रकारे राखले पाहिजे. माझी चौतीस वर्षा ची सेवा झाली यामध्ये मला असे दिसून आले की पोलिस व जनते मधील संबंध हे योग्य प्रकारे जपले जात नाहीत. पोलिस हा जनतेचा रक्षक असतो. लोकांनी पोलिसांबद्दल बोललं पाहिजे तर पत्रकारांनी लिहिले पाहिजे. आरसा दाखवणारे लोक सध्या गरजेचे आहेत. पत्रकारांनी शासकिय यंत्रणेला आरसा दाखवण्याचे काम करावं. जनतेच्या मनामध्ये गुलामगिरीची मानसिकता झालेली आहे याचा फायदा शासकीय यंत्रणा घेत आहे. आज सर्वत्र जनतेची पिळवणूक होत आहे. कारण लोकांच्या मनामध्ये गुलामगिरीची मानसिकता झालेली आहे. काही काम न करता भांडत बसण्यापेक्षा कर्तव्यामध्ये कसूर न करता काम करा व ते काम परिपूर्ण करा असे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे हे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, सन १९६७ साली पोलिस पाटील पदाची नियुक्ती झाली. सुरवातीला बरीच पदे रिक्त होती. २८६ पदांची सुरवातीला जाहिरात काढली परंतु सध्या १४५ पोलिस पाटील आज कार्यरत आहेत आज ही अनेक पदे रिक्त आहेत. पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम भाग आहे. परंतु जवळजवळ या डोंगराळ भागात ही आमचा पोलिस पाटील कार्यरत आहे. तुम्ही सर्वांनी योग्य प्रकारे काम करावे. ही आमची अपेक्षा आहे. प्रशासनाचे कान , नाक व डोळे म्हणून तुम्ही काम करत आहात त्यामुळे ते चांगल्या प्रकारे करावे. त्याने गटातटाच्या राजकारणामध्ये पडू नये तर गावाचा विकास साधावा. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जर तुम्हाला मान सन्मान मिळाला तर ती तुमच्या कामाची पोचपावती आहे. तुमच्या कडून सर्वसामान्य माणूस ही समाधानी होऊन गेला पाहिज.
या कार्यक्रमामध्ये सेवा निवृत्त पोलिस पाटील शामराव गालवे व पोलिस पाटील नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील पोलिस पाटील महिला व नागरीकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार राहूल सत्रे यांनी मानले.
पोलिस पाटलांनी राजकीय गटातटाचं राजकारणं न करता आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. – अगंद जाधववर
RELATED ARTICLES