फलटण : रविवार पेठ फलटण येथील श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाची संगमरावरी मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात करण्यात आली.
वाद्यांच्या गजरात निघलेली भव्य मिरवणूक, हार-फुलांनी नेत्रदिपक सजावट,भक्तगणांची गर्दी,सडा-रांगोळीने स्वागत मंत्र, महाआरती, मगणपती बाप्पा मोरयाफचा जयघोष अशा उत्साही वातावरणात रविवार पेठ येथील श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापण सोहळा पार पडला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.निता मिलिंद नेवसे, फलटण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
रविवार पेठ येथे गेल्या 42 वर्षापूर्वी श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली होती. श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वर्षभर सातत्याने विविध कार्येक्रम उपक्रमचे आयोजन करण्यात येत असते. या मंडळाच्या संकल्पनानुसार स्थापन करण्यात आलेल्या मंदिरामध्ये श्री गणेश प्राणप्रतिष्ठापने निमित्ता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या मुर्तीची स्थापना, पुण्याह वाचन, शांती होम, जलाधिवास,अग्नि स्थापना, गृह स्थापना, उपदेवता स्थापना व महाआरती असे सलग तीन दिवस विविध कार्येक्रम उत्साहात पार पडले. श्री गणेश मूर्ती स्थापने निमित्त श्री गणेश मुर्तीची फलटण शहरातून उंट, घोड़े व शिवरुद्र वाद्य पथकाच्या नेत्रदीपक उपस्थितीत हार-फुलांनी सजविलेल्या ट्रॉली मधून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी श्री गणेशाचे भव्य स्वागत करून पुष्पव्रष्टी करून दर्शन घेतले. मिरवणुकीचा कार्येक्रम पारपडल्या नंतर श्री गणेशाची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात आली. शुभ्र संगमरवरतील श्री गणेशाचे आकर्षक रूप सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत होते.
या कार्यक्रमास फलटण शहर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर,फलटण नगर परिषदेचे नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, अँड. बाबुराव गावडे, पै. हेमंत निंबाळकर (आबा), अनिल शिरतोड़े, प्रतापसिंह निंबाळकर, प्रकाश (नाना) पवार, सुनील कदम, गुलाबराव जाधव, विविध संस्था मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, नागरिक, महिला बहुसंख्ये उपस्थित होते. महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिसरातील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.