Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीआमदार पृथ्वीराज बाबांचा प्रचाराचा धडाका

आमदार पृथ्वीराज बाबांचा प्रचाराचा धडाका

कराड : राफेल विमान प्रकरणात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे. एवढा अफाट पैसा या निवडणूकीत उधळला जाणार आहे. पैसा फेकून माणसं खरेदी केली जातील. दुर्दैवाने पुन्हा मोदी सत्तेत आल्यास पुन्हा निवडणूका होणार नाहीत, लोकशाही राहणार नाही आणि या देशाची घटनाही राहणार नाही, असा गर्भित इशारा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत दिला.
कराड तालुक्यातील मुंढे, गोटे, वारुंजी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभांत आमदार चव्हाण बोलत होते.यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील, निवासराव थोरात, शिवराज मोरे, जयंत पाटील, जि.प. सदस्या मंगलाताई गलांडे, विद्याताई थोरवडे, सुनील काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मोंदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात 45 वर्षांत कधी नव्हे इतके बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून हे केवळ मोदींचेच कर्तृत्व आहे. गुजरातप्रमाणे ते देश चालवायला निघाले आणि खड्ड्यात पडले. महाराष्ट्रात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. नरेगाची कामे करण्याची यांची दानत नाही. कारण सरकारकडे पैसाच नाही. केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही त्यांना अपयश आले आहे. 15 बड्या उद्योगपतींची कर्जे यांनी माफ केली. मोदींना शेतकर्‍यांची कर्जे माफ करा म्हटले, तर म्हणतात सवय लागेल. यांच्याकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायला पैसा आहे, अन् शेतकर्‍यांना द्यायला कारणे सांगत आहेत.
मन की बात करणार्‍या सरकारने मन की नव्हे तर केवळ धन की बात केली, असा आरोप करुन श्री. छ. उदयनराजे म्हणाले, खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला लोकहिताची कामे करण्यावाचून कोणी रोखले होते. त्यांच्याकडे केवळ इच्छा शक्ती नव्हती. त्यांनी केवळ मुठभर उद्योगपतींच्या हिताचाच विचार केला. या देशातील जनतेने यांना तळे रुपी देश राखायला दिला होता. पाच वर्षांत यांनी अख्खा देशच खाऊन टाकला आहे. आता यांनाच जनता या निवडणूकीत शिल्लक ठेवणार नाही. सत्तांतराशिवाय देशाची प्रगती होणार नाही.
यावेळी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, राजेश पाटील वाठारकर, अविनाश नलवडे, इंद्रजित चव्हाण, प्रतापराव देशमुख, झाकीर पठाण, दुर्गेश मोहिते, पराग रामूगडे, सुनील पाटील, शिवाजीराव जमाले, पोपटराव साळुंखे, आदिल मोमिन, अजितराव पाटील, गोटेचे सरपंच लाझम होडेकर, अविनाश पवार, रियाज पटेल, उमर सय्यद, रज्जाक पटेल, तायर आगा, नझीर देसाई, मुनिर सय्यद, आदिक पवार, अमित पाटील, अल्लाउद्दीन देसाई, लियाकत सय्यद, रविंद्र बडेकर, पांडूरंग जमाले, शामराव जमाले, शंकरराव चव्हाण, दिपक वाघमारे, पांडूरंग चव्हाण, रणजित पाटील, प्रशांत शिंदे, अमित पाटील, शंकरराव पाटील, राहूल पवार, आजिम ईनामदार, सुनील वरेकर, राहूल भोसले, मनिषा चव्हाण, अमित जाधव, शिवाजी जमाले, सुरेश भोसले, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील व पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular