म्हासुर्णे प्रतिनिधी (तुषार माने) :- संपुर्ण देशात व महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोणाची साखळी लवकरात लवकर खंडीत व्हावी यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमेटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी जनता कर्फ्यु आवाहन केले होते.त्यास गावातील नागरिक आणि व्यापाऱ्यानी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिला.बाजारपेठेसह कडकडीत लॉकडॉवुन पाळला गेला.
म्हासुर्णे परिसरातील मोठी बाजारपेठ असुन या ठिकाणी असणारी बाजारपेठ व भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पहायला मिळते.या वर्दळीचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे .ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे ओळखुन म्हासुर्णे कोरोना दक्षता कमेटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.
जनता कर्फ्यु २४,२५,२६,२६ एफ्रिलला जाहीर केला होता.म्हासुर्णे कोरोना दक्षता कमेटीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरुन वातावरण निर्मिती केली जात होती.कोरोना दक्षता कमेठी व पोलीस पाटील ही बाजारपेठ परिसरात जनजागृती करीत होते.याचा परिणाम अतिशय छान असा झाला की जनता कर्फ्युला प्रचंड प्रतिसाद लाभला.सर्व बाजारपेठ कडकडीत बंद होती.ग्रामस्थांनीही घरात राहुन या अभियनात मोठी सक्रीयता दिली.म्हासुर्णेत पुर्ण बंद असल्यामुळे बाजारपेठ परिसरात शुकशुकाट जानवत होता.व सर्व इतर व्यवहार मात्र बंद होते.
*ग्रामस्थांनी धोका समजुन घेतल्याने प्रतिसाद*
भविष्यातील संकटाची जाणीव करुन दिली.लोकांना जनता कर्फ्युचे आवाहन केले.त्याच बरोबर त्यांना याची आवश्यकता का आहे. याची जाणीवही स्पष्ट करुन दिली.वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.हे येथील जनता व व्यापाऱ्यानी समजुन घेतल्यानेच प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला.अशी माहिती म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी दिली.