Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपुस्तकरुपाने माणसे जीवंत राहिली पाहिजेत व त्यांचा इतिहास इतरांना मार्गदर्शक ठरला पाहिजेः...

पुस्तकरुपाने माणसे जीवंत राहिली पाहिजेत व त्यांचा इतिहास इतरांना मार्गदर्शक ठरला पाहिजेः रविंद्र बेडकीहाळ

फलटण ः माणूस किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये कधी काय घडेल याचा नियम नाही. आपल्या कर्तृत्वाने माणसाने जीवन बदलून इतरांना प्रकाशमान करावे. ही प्रकोशित करणारी माणसे इतिहास घडवितात. जोपर्यंत इतिहास लिखीत होत नाही तोपर्यंत त्या माणसाचे कार्यही मर्यादित रहाते. पुस्तकरुपाने माणसे जीवंत राहिली पाहिजेत व त्यांचा इतिहास इतरांना मार्गदर्शक ठरला पाहिजे. संघर्ष चरित्र समाजाचा ठेवा आहे, असे मत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व मसाप पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
येथील माणगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सिताराम कदम यांच्या जीवनचरित्रावर आधारीत, साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखीत संघर्षफ या पुस्तकाचे प्रकाशन हरणाई सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजीतभैय्या देशमुख यांच्या हस्ते कदम प्लाझा, दहिवडी येथे संपन्न झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन बेडकिहाळ बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव गुंडगे, साहित्यिक तानाजी जगताप, माजी पंचायत समिती सभापती अतुल जाधव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल सुभेदार, डॉ.महादेव कापसे, लेखक ताराचंद्र आवळे, सिताराम कदम उपस्थित होते. रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले, माणदेशात पाण्याचा दुष्काळ आहे. पण बुद्धिवंतांचा सुकाळ आहे. कर्तृत्त्ववान माणसांमुळे माणचा झेंडा अटकेपार रोवला गेला आहे. सिताराम कदम उर्फ आबा हे माणचे भूषण असून अबोल नेतृत्त्व आहे. निरपेक्ष भावनेने त्यांनी केलेले काम त्यांच्या संघर्ष या चरित्रात वाचायला मिळेल. खर्‍याअर्थाने आबा म्हणजे माणचं झाकलं माणिक आहेत. समाजामध्ये दु:ख सोसल्याशिवाय प्रगती नाही. प्रत्येकाचा प्रपंच सुखी झाला पाहिजे. यासाठी केलेली धडपड वाखाणण्याजोगी असून सहकाराला प्रतिष्ठा सिताराम कदम यांनी प्राप्त करुन दिली. अशा व्यक्तीचे लेखक ताराचंद्र आवळे यांनी चरित्र प्रकाशित करुन समाजापुढे आदर्श ठेवा ठेवला आहे.
रणजितभैय्या देशमुख म्हणाले की, आत्मीयता, सचोटी व सूक्ष्मपणा या जोरावर आबांनी प्रगती साधली. त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. संघर्षफ चरित्र विचारांचा वसा आहे. अ‍ॅड.भास्करराव गुंडगे म्हणाले, संघर्षमय जीवन जगताना संघर्षफ चरित्र मार्गदर्शक आहे. यातून युवकांनी प्रेरणा घेवून देशसेवा केली पाहिजे. तानाजी जगताप म्हणाले, माणची मान उंच करण्याचे काम संघर्ष चरित्रातून होणार आहे. माणमध्ये ढगात पाणी नाही. शेतात पीक नाही. पण बुद्धीवाद्यांचा सुकाळ आहे. हीच खरी माणची संपत्ती आहे. संघर्ष चरित्रातून माणसे घडावीत हीच अपेक्षा आहे. सिताराम कदम म्हणाले, प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात मी यशस्वी झालो. श्रमाला देव मानून काम केले. निर्व्यसनी हा, ध्येय निश्‍चित करा, प्रामाणिक कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी व संवेदनशिलता यावर यश अवलंबून आहे. माझा जीवनप्रवास संघर्षाकडून समृद्धीकडे आहे.
यावेळी अतुल जाधव, बाबासाहेब हुलगे, जाधव मामा, छाया जाधव, अनिल सुभेदार, डॉ.महादेव कापसे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक ताराचंद्र आवळे यांनी करुन चरित्राविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गाडे यांनी केले तर आभार दत्तात्रय कणसे यांनी मानले.
कार्यक्रमास कवी अविनाश चव्हाण, आकाश आढाव, दलित गायकवाड, अस्लम शेख, ज्ञानेश्‍वर वाघ, चंद्रकांत वाघ, महेश कदम, सुशिल गायकवाड, चंद्रकांत जगदाळे, सोमा हिरवे, हेमलता कदम, सुधिर कदम, विजय जाधव, अजित कुंभार, बलदेव जाधव, आप्पासोा जगदाळे, माणगंगा पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लेखक ताराचंद्र आवळे, संघर्ष चरित्राचे नायक सिताराम कदम, त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला कदम यांचा तसेच रविंद्र बेडकिहाळ यांचा पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल माणवासियांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदम ग्रुप, अष्टविनायक बाल गणेशोत्सव मंडळ, माणगंगा पतसंस्थेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular