रहिमतपूर येथील ‘निर्धार परिवर्तन’ सभेत माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांची खरमरीत टिका
रहिमतपूर:2014 साली भाजपाने भूलथापा मारुन सत्ता मिळविली. विकासाची स्वप्ने दाखवून जनतेला फसविले. निवडणूक काळात त्यांनी जी आश्वासने दिली ती साडेचार वर्षात पूर्ण केली का? असा सवाल करीत उलट भाजप-शिवसेनेने जाती-जाती मध्ये तेढ निर्माण केली. समाजात जाती धर्माच्या भिंती उभ्या करीत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. अश्या या हुकुमशाही प्रवत्तीच्या केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारला जनतेने खाली खेचावे अशी खरमरीत टिका महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी केली.
रहिमतपूर (ता. कोरेगांव) येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वत्तीने भव्य परिर्वन निर्धार मेळाव्या निमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ. धनंजय मुंडे, आ. शशीकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, वसंतराव मानकुमरे, राजाभाऊ जगदाळे, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष चाँदगणी आतार, शाहूराज फाळके यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आ. पवार पुढे म्हणाले की, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या दूरदष्टीतून महाराष्ट्र घडला 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. या जिल्ह्याने शरद पवार व पक्षाला समर्थ साथ दिली. या काळात अनेक प्रकल्प उभे राहिले. गावागावात विकासकामांचा डोंगर उभा राहिला. ख-या अर्थाने जनतेच्या वचनपुर्तीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसने केले. शेतक-याच्या मालाला भाव नाही, ऊसाला एफआरपी नाही त्यामुळे शेतकरी व कारखानदारी अडचणीत आली आहे. आंदोलने करुनही शेतकर्यांना व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांना साथ दिली पाहिजे. असे नमूद करुन ते म्हणाले की, सत्ताधारी भाजप शिवसेना युतीला दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, देशातील हवा बदलली आहे भाजपचा तीन राज्यात पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. चोकाचोकात अच्छे दिन ची चेष्टा होवू लागली आहे. महागाई, नोटा बंदी, जीएसटी, कर्जमाफी यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाली आहे. विविध समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोड्विण्यास सरकार अपयशी ठरले आहे. परिर्वतानाची लढाई आपणाला एकत्र येत जिंकायची आहे. यासाठी राष्ट्रवादी व समविचारी पक्षांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
आ. जयंत पाटील म्हणाले की, टीव्ही जाहिरातीच्या माढ्यमातून लोकांना फसविणे, कामाचा आभास निर्माण करणे आश्वासने देणे ही भाजप शिवसेनेची सवय आहे. साडेचार वर्षात जनतेच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याने महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्रूटीत गेला आहे तो झाकून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
यावेळी आ. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आ. शशीकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी सरकारच्या धोरणावर व कारभारावर टिका केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील माने यांनी केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कोरेगाव, कराड, सातारा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक हजोरोंच्या संख्येने उपस्थित होते.
हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारला जनतेने खाली खेचावे
RELATED ARTICLES