रहिमतपूर: सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच रहिमतपूर पोलीस ठाण्याचा राज्यात पहिला क्रमांक तर देशात 50 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासीत प्रदेशांसह सर्व राज्यातील पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकांद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर राज्यात प्रथम आल्यामुळे रहिमतपूर पोलीस ठाण्याची मान राज्यात गौरवाने उंचावली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका विशेष पथकाने एक महिन्यापुर्वी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात येवून अचानक सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये जनसंपर्क, गुन्हे शोध, दोषसिध्दी, तक्रार देण्यासाठी आलेल्यांना वागणूक तसेच हद्दीत कोणत्याही प्रकारची घटना घडल्यानंतर किती वेळात प्रतिसाद देण्यात येतो. तक्रारदाराची कशा प्रकारे दखल घेतली जाते, प्रभारी अधिकारी यांची कर्मचार्यांच्या सोबत वागणूक, न्यायालयातील प्रलंबित खटले, महिला व बालकांना देण्यात येणार्या वागणुकीची या पथकाने बनावट तक्रारदार पाठवून तपासणी केली होती.
रहिमतपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या कालावधीतील कामकाज या पथकाने अचानक तपासल्यानंतर त्यांनी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घन:श्याम बल्लाळ यांनी प्रत्येकाला दिलेली वागणूक आणि नागरिकांशी असलेला जनसंपर्क योग्य प्रकारे असल्याचे समोर आले आहे. तसेच या सोबतच तक्तालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, सध्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे यांचेही मार्गदर्शन योग्य असल्याचे या पथकास दिसून आले. दरम्यान पोलीस ठाण्यामधील वाहनांची देखभाल, पोलीस ठाण्याची इमारत व परीसर स्वच्छ, भौतीक सुविधा या सारख्या विषयांर सर्व्हेक्षण केल्यानंतर रहिमतपूर पोलीस ठाण्याचा कारभार राज्यातील इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेत योग्य असल्याचे मत केंद्रीय पथकाचे झाले. त्यामळे वरिष्ठांकडून सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
रहिमतपूर पोलीस ठाण्याचा देशात 50 वा क्रमांक: केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व्हे
RELATED ARTICLES