साताराः नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून दरवर्षी माळेत अडकणारा पाऊस आज बुधवारी मात्र सणाच्या पुर्वतयारीसाठी येवून भरदुपारी जनजीवन विस्कळीत करून गेला. दुपारी 2 च्या सुमारास अचानक टपोंर्या थेंबाची बरसात करत आणि मोठया मेघगर्जनेसह सातारा शहराच्या पुर्व भागात सुरू झालेला पाऊस अचानक आल्याने मोठी तारांबळ उडाली. गुरूवारी साजरी होणार्या नवमी, नवरात्र उत्थापन आणि विजयादशमीच्या निमित्ताने बाजारात लगबग सुरू होती. मोठया प्रमाणात आपटयाची पाने व केशरी पिवळया रंगाची झेंडू फुले प्रमुख ठिकाणी विक्रीला आली होती. बाजारपेठेतही उद्याच्या मुहूर्तावर केल्या जाणार्या खरेदीसाठी व्यापारीवर्ग आणि ग्राहक दिसत होते मात्र या पावसाने या सार्यांचीच दैना केली. जोराच्या पावसाने परिसरातून पाण्याचे लोट वाहू लगले तर राधिका रोड, राजवाडा गोल बाग, देवीचौक, शाहुचौक परिसरात पाण्याची तळी साठली.शेतात काढणी सुरू असलेल्या सोयबीन व भुईमूग, भात पिकाच्या काढणीला मोठा फटका बसला. या पावसामुळे रब्बी हंगामाच्या ज्वारी पिकाच्या पेरणीवर दिरंगाईचा परिणाम होणार असे मत शेतकरी वर्गातून व्ययक्त होत आहे.
सातार्यात वळवाच्या पावसाने जनजीवन विस्कळीत
RELATED ARTICLES