कडधान्य, तांदूळ महोत्सव ; 1 टन वजनाची गाडी ओढणारा कुत्रा, दीडशे किलोचा बोकड प्रदर्शनाचे विशेष आकर्षण
साताराः जिल्ह्याचे लाडके खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या संकल्पनेतून सैनिक स्कुल मैदान सातारा येथे दि. 23फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान दुसरे राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट एक्स्पो ग्रुप तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व सैनिक स्कुलचे रजिस्ट्रार कर्नल रणजीत नलावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले,निशांत पाटील,ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ.संजोग कदम,सभापती यशोधन नारकर,अली शेख,अॅड.दत्तात्रय बनकर, ,किशोर शिंदे ,श्रीकांत आंबेकर, स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे,विठ्ठल जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री.कांबळे,मनोज शेंडे,सौ.स्मीता घेाडके, सौ.सुजाता राजेमहाडिक, सौ. स्नेहा नलावडे, सविता फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनाचे यशस्वी संयोजनासाठी गौरव जाधव,इंद्रजीत कदम व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
सातारा शहरामध्ये यावर्षी प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठीच हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या छताखाली बि-बियाणे, शेती अवजारे,ट्रॅक्टर्स, ठिबक सिंचन, रोपवाटिका, खते औषधे, शेतीविषयक पुस्तके, फळ उत्पादन, सौरउर्जा उपकरणे पाहण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. प्रथमच देशी बियाण्यंाचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्वतंत्र दालन या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या शेतकर्यांकडे देशी बियाणे उपलब्ध असतील त्यांना मोफत दालन देण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
शहरातील लोकांसाठी राजधानी कृषी प्रदर्शनामध्ये कडधान्य महोत्सव व तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा येथे शेतकरी बाजार प्रदर्शनामध्ये भरवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी त्यांचा शेतीमाल रिटेल किमतीमध्ये थेट ग्राहकांना विक्री करू शकतो. त्यासाठी मोफत स्टॉलची सोय करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये ऊस पीक स्पर्धा, भाजीपाला स्पर्धा, द्राक्षे स्पर्धा, बेदाणे स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. तरी शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीमालाचे नमुने स्पर्धासाठी प्रदर्शनामध्ये घेवून येण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आयोजित केलेल्या या प्रदर्शनात देशातील नामवंत कंपन्यांचे 300 हून अधिक स्टॉलचा सहभाग राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनात यामध्ये शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग्याच्या,शेतकर्यांसाठीच्
राजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मंडप उभारणीचा शुभारंभ
RELATED ARTICLES