Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीरस्ता जोडल्यास पर्यटनाचा खजाना दृष्टीक्षेपात

रस्ता जोडल्यास पर्यटनाचा खजाना दृष्टीक्षेपात

पाटण, सातारा, जावली, महाबळेश्वर डोंगरमाथ्यावरील गावे कायमस्वरूपात दळणवळणात येतील
परळी (अल्पेश लोटेकर) : कोणत्याही परिसराचा विकास साधायचा असेल तर दळणवळणाची सुविधा भक्कम करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्या पर्यटनस्थळांचा विकास होतो. याच दळणवळणा पासून स्थानिकांना रोजगार मिळतो. सातारा शहरा जवळील सातारा, जावली, पाटण, महाबळेश्‍वर तालुक्यात कास पुष्प पठार, बामणोली, चाळकेवाडी पवनचक्क्यांचे जाळे, सज्जनगड, उरमोडी, कण्हेर धरणे, आध्यात्मिक स्थळे, महाबळेश्‍वर येथे पर्यटक भाविक येत असतात. मात्र उलट सुलट प्रवास झाल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असतो.
या चार तालुक्यातील गावे डोंगरमाथ्यावरील रस्त्यानेच जोडली तर पर्यटन, स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
सातारा जिल्हयाला विपुल प्रमाणात वनसंपदा मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे सातारा जिल्हयात आहेत. जागतिक दर्जाचे कास पुष्प पठार, आशिया खंडातील सर्वात मोठे चाळकेवाडी वन कुसावड़्याचे पवनचक्क्यांचे पठार अशा कित्तेक गोष्टी या चार तालुक्यांमध्ये विखुरल्या आहेत. मात्र या ठिकाणी जाताना उलटा सुलटा प्रवास करावा लागत असल्याने पर्यटकांची धोबीपछाड होत आहे.
सध्यस्थितीत कास पुष्प पठारावरून भांबवली, बामणोली पर्यंत रस्ते आहेत. तिथून केळवली सांडवलीला अथवा आलवडीला जाता येत नाही. त्यामुळे उलटे सातार्‍यात यावे लागते. कास पठारावरुन -भांबवली- झुंगटी-जळकेवाडी-केळवली-नित्रळ-परळी हा रस्ता आहे. मात्र काही ठिकाणी या रस्त्याला डागडुजी आणि वनखात्याच्या अडचणी हे प्रश्‍न सोडविल्यास सातारा कास बामणोली परत भांबवली, केळवली मार्गे सातारा किंवा सज्जनगड जाता येईल किंवा झुंगटी ते धावली हा रस्ता सध्यस्थितीला चालु आहे. हा रस्ता आलवडी पर्यंत जोडल्यास आलवडी पाटेघर रोहोट मार्गे सातारा किंवा ठोसेघर-चाळकेवाडीला जायचे असेल तर कास पठारावरून आलेला झुंगटी धावली मार्गे आलेला रस्ता केळवली, दत्तवाडी, सांडवली (गणेशवाडी) मार्गे पांगारे ठोसेघरला (दत्तवाडी ते सांडवली हा रस्ता फक्त जोडणे बाकी आहे.) सज्जनगड चाळकेवाडी ते अगदी चाळकेवाडीच्या पुढे पाटण पर्यंत हा रस्ता तयार आहे.
म्हणजेच महाबळेश्वर तापोळा मार्गे आलेली वाहणे कासपठार, भांबवली वजराई धबधबा केळवली सांडवली धबधबा, भात शेती, मोरबाग गुहा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा चाळकेवाडी पावनचक्क्या पाहून पाटण मार्गे जावू शकतात. ही अशी वाहतूक झाल्याने स्थानिकांना बाजापेठ उपलब्ध होईल. त्यांच्या कच्या मालाला बाजारपेठ मिळेल, पर्यटन, रोजगार वाढेल, सातारा शहरातून जाणार्‍या कास मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे. या परिसरातली विलोभनिय कोयना, उरमोडी तारळीचे बॅक वॉटर, तांबीच्या पठारावरून दिसणारा वासोटा किल्ला विविध वन औषधी वनस्पती यांचे सहज दर्शन होणार आहे. हा सर्व नजारा एकत्रित करण्यासाठी काही ठिकाणी वनखात्याची परवाणगी घेणे तर केळवली सांडवली हा रस्ता जोडणे व धावली आलवडी हा रस्ता जोडणे ही महत्त्वाची कामे पुणे करणे शिल्लक आहेत. ही कामे पुर्ण झाल्यास या वाडीवस्त्यांवरील सर्व गावे बारा महिने संपर्कात येतील.
रस्ता झाल्यास सुखकर प्रवास होणार
सातारा नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. त्याचे निसर्ग सौंदर्य एका सरळ मार्गाने सहज शक्य झाल्याने पर्यटकांचा ओढा हा दिवसेंदिवस वाढतच राहणार यात शंकाच नाही. डोगरावरचा हिरवा शालू, त्यावर धुक्यांची चादर असे विलोभनिय प्रसंग पर्यटकांना अनुभवता येईल. तसेच निर्गाचा आनंद घेत सरळमार्गे प्रवास हा सुखकर होईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular