कराड : जे सोबत येतील त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लोकसभा निवडणूक लढवू आणि जे सोबत येणार नाहीत, त्यांच्याशिवाय ही निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार रावसाहेब दानवे यांनी मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा आम्ही जास्त जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतविभाजन टाळण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे आपली इच्छा आहे. मात्र सद्यस्थितीत आमच्यासोबत जे येथील त्यांच्याशी युती करून आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली आहे.जे आमच्या सोबत युती करणार नाहीत, त्यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे.
आपल्या नगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार, मंत्री अर्जुन खोतकर यांनी दावा केला आहे ? असा प्रश्न विचारताच कोणताही पक्ष आपण जिंकलेली जागा कधीच दुसर्या पक्षासाठी सोडत नाही, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी आपला मतदारसंघ अर्जुन खोतकर यांना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगितले.
जे सोबत येणार नाहीत त्यांच्याशिवाय निवडणूक लढवू : रावसाहेब दानवे
RELATED ARTICLES