सातारा :- राज्यातील कोरोनाच्या भयानक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकार तर्फे गरिबांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून अन्नधान्य पुरवठ्यात अनियमितता असेल व त्यामुळे गोरगरीब वंचित राहत असतील तर त्वरीत शिवसेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटांशी मुकाबला करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीमुळे गोरगरिबांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.या काळात शेतीसह उद्योग व व्यवहार बंद असल्याने अनेक शेतमजूर, कामगार, हमलीचा व्यवसाय करणारे लोक, अपंग,बेघर,गोरगरीब, हॉटेल व अन्य व्यवसायातील रोजंदारीवर काम करणारे मजूर यांच्या बरोबरच सर्वसामान्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनातर्फे मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे.
सातारा शहरात सुद्धा अन्नधान्य पुरवठा शासनातर्फे सुरू करण्यात आला आहे यामध्ये कोणती अनियमितता आढळल्यास ९४२३०३२०८५ या क्रमांकावर संपर्क साधावा . तसेच कोणी रेशन दुकानदाराने धान्य देण्यास टाळा टाळ केल्यास शिवसेना शहर कार्यालय – १३९/२, सोमवार पेठ,सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.