सातारा : श्री गणरायाचे आगमनाच्या निमित्ताने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये भारतीय संविधानाच्या ग्रंथावर गणरायाला बसविण्यात आले. असा देखावा करून फेसबुकवर हा देखावा प्रसारित करणारे सिनेअभिनेते प्रविण तरडें वर संविधान अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना व आर पी आय(ए) व आठवले गट,सातारा जिल्हा यांनी केली आहे. यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणराय भक्त सिनेअभिनेते प्रविण तरडे यांनी भारतीय संविधान ग्रंथावर श्री गणरायाची मूर्ती विराजमान झाली असा देखावा तयार केला होता. हा देखावा तयार करताना भारतीय संविधान ग्रंथाचा वापर करून भारतीय संविधान प्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. याबाबत फेसबुक पाहताना सदरची माहिती समजल्यानंतर सर्वात प्रथम दलित पँथर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतली होती.त्यानंतर चूक कबूल करून तरडे यांनी श्री गणराय देखाव्यातील भारतीय संविधान ग्रंथ सन्मानपूर्वक बाजूला काढून पँथरच्या सुचनेचे पालन केले. मात्र, भारतीय संविधान बाबत मौन बाळगणाऱ्या प्रमुख राजकीय पक्ष व इतर संघटनेनी भूमिका जाहीर केली नाही.याचा संताप व्यक्त करून
सिनेअभिनेते प्रविण विठ्ठल तरङे रा.पुणे यांच्यावर राष्ट्रीय सन्मान अधिनियमाचा अपमान रोखणे कायदा १९७१ (The Prevention Of insults To National honour act.1971 act.No.69 Of 1971) त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश आप्पासाहेब गायकवाड व आर पी आय(ए) गट जिल्हा सचिव किरण बागडे व जावळी तालुकाध्यक्ष अमित साळुंखे, आर पी आय (आठवले गट) माण -खटाव तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गणरायाच्या आगमनाने मंगलमय वातावरण पसरले आहे.अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. त्यातच हा प्रकार घडला असून त्याला विरोध केल्यास कट्टर हिंदुत्ववादी व राजकीय पक्षांतील स्वतःला राष्ट्रवादी,भारतीय पण निधर्मी समजणारे कार्यकर्ते नाराज होतील म्हणून या बाबत मौन बाळगून आहेत. अशी टीका सातारा जिल्ह्यातील पुरोगामी संघटनेचे नेते व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.सिने अभिनेते प्रविण तरडे यांच्यावर खर म्हणजे सरकारने किंवा पोलीस दलाने गुन्हा दाखल करण्यास हवा होता. असे मत जेष्ठ विधिज्ञ व सेवानिवृत्त उपप्राचार्य ऍड. विलास वहागावकर,ऍड. नंदकुमार मोहिते, ऍड दयानंद माने व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी सांगितले.