वडूज : समाजामध्ये चांगले कार्य घडण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र आले पाहिजे असे मत वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी व्यक्त केले.
वडूज येथे येरळा परिवार व खटाव तालुका सोशल फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष दिलीपराव डोईफोडे, मजूर फेडशन संचालक सचिनशेठ माळी, विजय शिंदे, प्रदीप शेटे, प्राचार्य आनंदराव नांगरे, टि.के.देवकर, जयवंत पाटील, धनंजय गोडसे, विद्यासागर माने, डॉ. संतोष देशमुख, डॉ. सोमनाथ काळे, ईश्वर जाधव, विद्यासागर माने, हर्षवर्धन पंडित, निलेश पवार, हणमंतरावकोळेकर, नितीन शेडे, विलास बुरंगले, चारूदत्त गाढवे, राजेंद्र शेटे आदी उपस्थित होते. विठ्ठलस्वामी म्हणाले, आजकाल मनुष्य भौतिक सुखाच्या पुर्ण आहारी गेला आहे. पैसा, प्रतिष्ठा या दोन गोष्टींसाठी मानसे तळमळत आहेत. चांगले कार्य केले की पद व पैसा आपोआप मिळतो. एकमेकांबद्दल द्वेष भावना न बाळगता निकोप स्पर्धा करावी. चांगल्या विचाराचे लोक एकत्र आल्यास एक सामाजिक शक्ती तयार होते. या शक्तीच्या माध्यमातून दिनदुबळ्यांसाठी कार्य झाले पाहिजे. यावेळी प्राचार्य डोईफोडे, डॉ. देशमुख यांची मनोगते झाली.
चांगल्या सत्कर्मासाठी सज्जनांनी एकत्र यावे : विठ्ठलस्वामी महाराज
RELATED ARTICLES