कराड : येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात (कराड) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित उपस्थित राहणार असून इंद्रजित देशमुख (काकाजी) सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अशोक चव्हाण व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली.
ॠशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, रानकवी ना. धो. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, शांतीलाल मुथा व इंद्रजित देशमुख (काकाजी) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
द. 6 जुलै रोजी सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी श्रीनिवास पाटील यांना संस्थेच्या विश्वस्तांनी विनंती केली होती. दि. 10 जुलै रोजी श्रीनिवास पाटील यांनी स्वीकृती दिली.
_ारुल हवेली, ता. पाटण येथील श्रीनिवास पाटील यांनी शिवाजी विद्यालय कराड येथील विद्यालयीन शिक्षणानंतर एस.पी. कॉलेज पुणे, पुणे विद्यापीठ येथून पद्व्युत्त शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. 1965 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्यानंतर 1975 पर्यंत करवीर, हिंगणघाट, संगमनेर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. नोकरीच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपर-चिंचवड येथे काम केल्यानंतर 1979 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना पदोन्नती मिळाली. राज्य सहकार संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, आयुक्त, विभागीय उपायुक्त अशा विविध शासकीय सेवेत काम करताना सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे त्यांनी केली. नक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे व पाटील कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्व. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखालीच श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला व या सेवेत यशवंतरावांच्या कल्पनेतील महाराष्ट्र साकार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कराड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविली. या मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले. या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.हत्य, कला, क्रीडा, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात योगदान देताना कराड येथे झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्याध्यक्षपद भूषविले. तसेच 84 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नेटक्या संयोजनात त्यांचे मार्गदर्शन होते. महाराष्ट्रातील लोककला, कबड्डी, खो-खो व कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
ॠशवंत विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर या विचारांची पाठराखण करणार्या श्रीनिवास पाटील यांना 2019 मधील सातारा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी दीर्घकालिन समाजसेवा केली असून राज्याच्या व देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणार्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान देतानाच स्व. चव्हाणसाहेबांच्या विचारांचा जागर करणारे व्यक्तीमत्व म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांची समाजामध्ये ओळख आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सभासद व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे.
श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES