सातारा : सत्तेवर आलेल्या सातारा विकास आघाडीने निवडुण येण्यापुर्वी सातारकर जनतेला सव्वा वर्षात केवळ विकासाची स्वप्नेच दाखवली आहेत. नगराध्यक्षा या कठपुतली आहेत, हे अनेक बाबींतून समोर आले आहे. सातारा विकास आघाडीतील गटबाजीचा त्यांच्यावर दबाव आहे. मुख्याधिकारी नगराध्यक्षांचा सह्या न घेता बीले काढण्याचे धाडस कसे काय करतात. पालिकेच्या कारभाराची जिल्हाधिकार्यांनी चौकशी करावी असे आ. शिेवेंद्रसिहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
पालिका सत्तेतील सातारा विकास आघाडी विरोधी नगर विकास आघाडीच्या नगरसेकवकांनी सुचविलेली कामे करीत नाहीत या सत्ताधार्यांच्या निषेधार्थ नगर विकासच्या नगरसेवकांनी पालिकेसमोर चक्रीउपोषण सुरू केले होते. त्या उपोषणस्थळी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भेट देवून विचारपूस केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शहरातील स्ट्रीट लाईट, रस्याचे पॅचिंग, तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्काराचा पालिकेला पडलेला विसर यावरून सत्ताधारी काय कारभार करतात हे दिसून येत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार हा मुख्याधिकारीपुरता मर्यादित नाही तर त्याची मजल त्याच्या पलीकडे गेली आहे. त्याची लिंक कुठेपर्यंत आहे ते तपासण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे. निवडणुकीवेळी सातारकरांना विविध आश्वासने देऊन स्वप्ने दाखवली परंतु प्रत्यक्षात गेल्या सव्वा वर्षात सत्ताधा-यांचा कारभार त्याच्या उलट आहे. नगराध्यक्षा कठपुतली झाल्या आहेत हे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते. साविआच्या विविध गटांचा त्यांच्यावर दबाब आहे. एकटे मुख्याधिकारी नगराध्यक्षांची सहया न घेता बिले काढण्याचे धाडस करु शकणार नाहीत या पाठीमागे कोण आहे याची जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी सांगीतले. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना कासचे काम केले आहे. अनेक परवानग्यामुळे ते लांबले होते. ही भूमीपूजने नवीन नाहीत. मागची ही कामे मंजूर झालेली आहेत. नवीन आलेल्या बॉडीच्या सत्ता आहे. म्हणून भूमिपूजने होत आहेत. तसा त्या कामांचा अर्थाअर्थी संबंध नाही. अजितपवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळीच डीपीसीतून काही वेगळी तरतूद करुन घेतली. रामराजे पालकमंत्री होते. हे सगळे रेकॉर्ड आहे, त्यांनी कुठले विषय अंजेंड्यावर घेतले ते दाखवावे, असेही त्यांनी सुचित केले.
सातारा पालिकेच्या नगराध्यक्षांवर गटबाजीचा दबाव : आ. शिवेंद्रराजे ; जिल्हाधिकार्यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी
RELATED ARTICLES