सातारा :महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या सातार्यातील छत्रपती शिवराय यांच्या वंशजांचा राजकीय संघर्ष नवा नाही पण, काल, दोन्ही राजे यांनी एकमेकांना पूरक रित्या पहात स्मितहास्य केले. त्यामुळे ऐन थंडीत त्यांच्या समर्थकांना चांगलीच ऊब मिळाली आहे.
याबाबत माहिती अशी की, अडीच वर्षे पूर्वी खा श्री छ उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय मनोमिलनाचा दोर काही राजकारणातील आनाजी पंतांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कापली.तेव्हापासून सातार्यातील राजघराण्यातील संघर्ष रस्त्यावर उतरला. आनेवाडी टोलनाका ठेका वसुली राड्यानंतर सुरुची बंगल्यासमोर दोन्ही राजे आमने-सामने आले. यावेळी शाहूपुरीचे पो नि किशोर धुमाळ यांनी जिवाजी महाले यांची भूमिका घेतली आणि स्वतःच्या हातावर वार झेलला. त्यानंतर जुन्या मंडईत नगर सेवक रवि ढोणे व खुटाळे यांच्या जागेतील दारू दुकान पाडण्यावरून खासदार व आमदार आणि त्यांचे समर्थक एकमेकांना भिडण्याची तयारी करीत असताना तत्कालीन पोलीस उपअधिक्षक गजानन राजमाने यांनी नम्रपणे दोन्ही लोकप्रतिनिधी व राजे मंडळींची समजूत काढली. त्यांना दोन्ही बाजूला सारून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला.यानंतर अनेकदा निवेदने, पत्रकबाजी तुन त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राजे एकत्र आले की, सातारा पोलीस तणावाखाली वावरताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे ती कोणीही नाकारू शकत नाही.
परंतु, काल एका लग्न समारंभा निमित्त दोन्ही राजे एकमेकांच्या समोर आले आणि त्यांनी स्मितहास्य करीत एकमेकांचा सन्मान राखला. त्यावेळी उपस्थित असलेल्या राजे समर्थकांनी चांगलीच दाद दिली.एकमेकांचे राजकीय करियर संपविण्याची भाषा करणार्या छत्रपती शिवराय यांच्या राजघराण्यातील दोन्ही बंधूनी एकत्र यावे अशी मागणी सहयाद्री फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष शभूशेठ पवार व नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी नगर परिषद सभागृहात तशी मागणीही केली होती.तमाम सातारकरांनी हीच भावना व्यक्त केली आहे.तर दुसर्या बाजूला जेष्ठ नेते शरद पवार यांनी खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या बद्दल मीडियाने काळजी करू नये असा सल्ला दिला आहे.
काल सातार्यात दोन्ही राजेंनी स्मितहास्य करूनकितने भी तू करले सितम,,, हस हस के सहेंगे हम,,, ये प्यार ना होंगा कम,, सनम मतेरी कसम,,, याची आठवण करून दिली आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राजे एकत्र आले पाहिजे अशी श्री ची इच्छा आहे अशी अपेक्षा सातारा जिल्हातुन होत आहे.
कितने भी तू करलो सितंम,हस हस के सहेंगे हम, सातार्यात प्रथमच दोन्ही राजेंचे स्मितहास्य
RELATED ARTICLES