औंध : आगामी काळात शेत जमिनीची गुणवत्ता टिकविण्यासाठी व दर्जेदार पीक उत्पादनासाठी सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी दिली.
आमलेवाडी तालुका खटाव येथे उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीम अंतर्गत सेंद्रिय शेती व शेतमाल प्रक्रिया या विषयावर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी शेतक़र्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कृषी पर्यवेक्षक विजय वसव ,कृषी सहाय्यक आर. एस. ठोंबरे, के.जे.जाधव, नितीन कांबळे, के.आर.जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,आजकाल शेतकरी अधिक उत्पादन घेण्याच्या हेतूने विविध प्रकारची रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके,तणनाशक रासायनिक खते मोठया प्रमाणात वापर करत आहे त्याचे अंश मानवी शरीरावर विपरीत घातक परिणाम करत आहेत त्यामुळे अकाली वार्धक्य दुर्दम्य आजाराचे प्रमाण वाढले आहे यावर जर नियंत्रण मिळवून आपले जीवनमान सुखी करायचे आहे .आज शहरांमध्ये सेंद्रिय डाळी, भाजीपाला, फळे, यासारख्या शेतीमालाला भरपूर मागणी आहे
शेतकर्यांनी सेंद्रिय शेती गट तयार करून स्वतःचा एक शेतमालाचा ब्रँड बनावाला पाहिजे तरुणांना रोजगाराच्या भरपूर संधी यामध्ये उपलब्ध आहेत
सेंद्रिय शेती करीत असताना शेतकर्यांनी आपली जमीनीची सुपीकता वाढवली पाहिजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविले पाहिजे कि ज्यामुळे जमिनीतील जिवाणूंचे प्रमाण वाढेल त्यासाठी गांडुळ खत नाडेप खत निंबोळी खत शेंद्रिय खते जास्तीत जास्त प्रमाणात वापरले पाहिजेत
रसायनिक कीटकनाशके टाळून शेंद्रिय कीटकनाशके की जसे दशपर्णी अर्क ,लसूण मिरची अर्क बीजमृत जिवामृतचा वापर केला पाहिजे प्रत्येक शेतकर्याकडे एकतरी देशी गाय असणे आवश्यक आहे गाईचे फायदे भरपूर आहेत गाईच्या शेणाचा वापर ऊत्तम खत म्हणून होतो गोमूत्राचा वापर कीटकनाशक म्हणून अत्यंत गुणकारी आहे .हुमणी नियंत्रण साठी प्रकाश सापळे कसे वापरावेत याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.याप्रसंगी वडी, कोकराळे, गादेवडी, आमलेवाडी, गोरेगाव वांगी येथील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार एम डी मदने यांनी केले.
शेत जमिनीच्या गुणवत्तेसाठी सेंद्रिय शेतीची गरजः:सुनिल बोरकर
RELATED ARTICLES