सातारा : निवडणूका म्हंटल की, राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या घरात लगीन घाई असते. तर कार्यकर्ते वर्हाडी मंडळींच्या भूमिकेत वावरत असतात. या ठिकाणी अर्ज दाखल करण्याचा मुहुर्त साधण्यासाठी भटजीची आवश्यक्ता लागते.
पण सध्या कडक उन्हामुळे उमेदवार व कार्यकर्ते थंड पाण्यासोबत शाकाहारी जेवणाच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. दररोज किमान प्रत्येक जेवणामध्ये पालेभाज्या व दही-ताकाची मागणी होवू लागली आहे.
सकाळी सात वाजल्यापासून उमेदवार व त्यांच्या जवळचे समर्थक हे वार्तानुकुलीत वाहनांतून फिरत असले तरी, प्रचार करताना मात्र त्यांची कडक उन्हाशी गाठ पडत आहे. त्यामुळे अनेक ताजे-तवाणे वाटणार्या उमेदवाराच्या चेहर्यावर दुपारी एक वाजल्यानंतर थकवा जाणवत असतो. त्यातून मग मांसाहारी जेवण टाळून मटकी, वरण-भात, मेथी, पालक, वाटाणा, शेवगा, काकडी, बीट याचा समावेश असलेल्या शाकाहारी जेवणाचा आग्रह होवू लागला आहे. त्याच बरोबर थंडाव्यासाठी शीतपेय, थंडगार पाणी याची ही मागणी वाढू लागली आहे.
पूर्वी कार्यकर्ते जेवणासाठी मांसाहारीचा आग्रह धरत होते. पण अलिकडे कडक उन्हामुळे कार्यकर्तेसुद्धा काही अपवाद वगळता शाकाहारी जेवणाची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांच्या खर्चात बचत होत आहे. सध्या सातारा शहरातील नामावंत चार हॉटेल मधून प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांची उठ-बैस वाढू लागलेले आहे. तरीही काही उत्साही कार्यकर्ते चुटका करून येत असले तरी त्यांना शाकाहारी जेवणाशिवाय पर्याय राहिलेला नाही.
पूर्वी खेड्यापाड्यात जाऊन पद यात्रा काढल्या जात होत्या. काही प्रमुख नेत्यांच्या घरी उमेदवारासह कार्यकर्त्यांची पंगत बसत होती. आता मात्र काळ बदलला असून नामांकित हॉटेलशिवाय उमेदवार व नेत्यांना सुद्धा चैन पडत नसल्याचे दिसून येत आहे.
सातार्यात कडक उन्हामुळे उमेदवार व कार्यकर्ते पडले शाकाहारी जेवणाच्या प्रेमात
RELATED ARTICLES