वाई : शेतकरी हिताचा ध्यास घेऊन आपल्या संस्थानात शेती विकासाच्या विविध योजना राबविण्याचे महत्त्वपूर्ण काम राजर्षी शाहू महाराजांनी केले होते. 20 व्या वर्षी राज्यकारभाराला सुरुवात करताच त्यांनी संस्थानातील शेतजमिनींची पूर्णपणे माहिती घेऊन त्यानुसार शेतीच्या नियोजनास प्राधान्य दिले. शेतीतले अडथळे जाणून त्यावर उपाययोजना केल्या. आपल्या संस्थानात शेतीसंशोधन शाळा, शेती शाळा काढून शेती हा विषय अनिवार्य केला. धरणे बांधली, सिंचनाच्या योजना राबविल्या, तळी बांधली. शेतीचे तुकडे पडू नयेत यासाठी तुकडाबंदीचे फर्मान काढले. शेतीत नवनवीन प्रयोग करत शेतकर्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे यासाठी त्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहित केले. शेतकर्यांची मुले शिकली पाहिजेत यासाठी बोर्डिंग काढली. आपल्या संस्थानात शेतकर्यांसाठी कल्याणकारी योजना राबविणारे राजर्षी शाहू महाराज हे खर्या् अर्थाने रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त किसान परिवार, धम्मसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रागतिक इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राजर्षी शाहू : शेती आणि सहकार याविषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किसान नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामराव कर्णे होते.
ते पुढे म्हणाले, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतीमाल विक्री संघ उभारला. शेती संशोधनाला प्राधान्य दिले. शेतकर्यानी शेतात नवनवीन प्रयोग करून आधुनिक शेती करावी यासाठी शेती प्रदर्शने भरविली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधन विकासाला चालना दिली. शेतकर्यांना उत्तम बियाणे आणि खते मोफत उपलब्ध करून दिली. हळद, ऊस याशिवाय चहा, कॉफी, रबर, वेलदोडे, कोको, ताग, कापूस आदी पिके घेण्यासाठी शेतकर्यांना प्रवृत्त केले.
यावेळी किसान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना अॅकड. सुर्यकांत खामकर, डॉ. गजेंद्र पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्तविक केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन तर सुर्यकांत आंबेकर यांनी आभार मानले. आयोजनासाठी रवींद्र घोडराज, तात्या जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, प्रताप देशमुख, सुमंतराव सकटे, संजय गायकवाड, प्रा. सरदार मुजावर, चंद्रकांत मापारी, जॉन फणसे, अॅटड. जेजुरीकर, उदय शिंदे, संतोष गेडाम, तुकाराम वैराट, सरोज मिठारी, बावधन चे उपसरपंच तानाजी कचरे, दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
छ.शाहू महाराजांचे शेतीविषयक नियोजन आदर्शवत: डॉ लवटे
RELATED ARTICLES