सातारा ः शेतकर्यांचा विमा बँका परस्पर काढत आहेत, असा आरोप आज ग्राहक सरंक्षण समितीच्या सदस्यांनी केला. अशा बँकांची नावे द्या, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारकवर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्राहक संरक्षण समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांच्यासह ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. नाफेडचे केंद्र नागठाणे ता. सातारा येथे उपलब्ध व्हावे, त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच शेतकर्यांना महाबीजकडील बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी महाबीज कार्यालयाला सांगण्यात येईल. सध्या गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतूक करणार्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावलेले नसताता त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने साखर कारखान्यांच्या पत्र पाठवून रिफ्लेक्टर लावण्याविषयी सक्त सूचना द्याव्यात, असेही अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले.
शेतकर्यांचा विमा परस्पर काढणार्या बँकावर कारवाई : सचिन बारवकर
RELATED ARTICLES