सातारा: गोवा येथील राष्ट्रीय अधिवेशनानंतरची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची पहिली महामंडळ सभा संघटनेचे यांच्या अध्यक्षते खाली राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे संपन्न झाली.यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदी सातार्याचे सिध्देश्वर पुस्तके यांची निवड करण्यात आल्याचे करण्यात संघटनेचे नेते आ. शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केले.
महामंडळ सभेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय नेते मा.आ. शिवाजीराव पाटील,अध्यक्ष माधवराव पाटील,कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके,महासचिव ज्ञानतोष झा (बिहार) ,सहसचिव नामदेव रेपे,कार्यवाह अशोक पाटील संघटक सदस्य बाबूनी शेख (गोवा),वाई.एच गोवन्नवर (कर्नाटक),जगन्नाथ मोहंती(उडीसा),नारायण मंडळ (झारखंड),मुरारी मिश्रा (बिहार),उपाध्यक्ष दि.रा. भालतडक तुकाराम कदम या गोवा अधिवेशनात निवडणेत आलेल्या नूतन कार्यकारिणीस मान्यता देणेत आली.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे ,सरचिटणीस केशवराव जाधव,कोषाध्यक्ष तुकाराम कदम, सल्लागार बाळासाहेब काळे, रा.बा.लावंड,ज.शा.यादव, प्राथमिक शिक्षक बँक साताराचे चेअरमन राजेंद्र घोरपडे,व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे,मच्छिंद्र मुळीक,महेंद्र जानुगडे, मच्छीद्र ढमाळ, प्रदिपघाडगे,राजेंद्र बोराटे, विक्रम डोंगरे सातारा जिप शिक्षण समितीचे तज्ञ सदस्य रुपेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोवा अधिवेशनात केलेल्या मागण्या त्याअनुषगांने केलेला पाठपुराव्याचीमाहिती देवून प्रत्येक प्रश्न कोर्टात नेऊन न्याय मागणे हे शक्य नाही त्यासाठी संघटना भक्कम करुन संघटनेच्या जोरावर व संघटीत ताकतीवर प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहीजेत यासाठी संघटना भक्कम व मजबुत करावी असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले,
गोवा येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे भव्यदिव्य ऐतिहासिक अधिवेशन संपन्न झाले. देशाच्या शिक्षकमंत्र्यांनी प्रथमच संघटनेच्या इतिहासात विडिओ कॉन्फरन्स द्वारे शिक्षकांशी सुसंवाद साधला.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे शिक्षणपर मुक्तचिंतन अनमोल प्रभोधन झाले.त्यांनी प्राथमिक शिक्षकांचे महत्त्व अधोरेकीत करून 90व्या वर्षी शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणार्या अण्णांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.या ऐतिहासिक अधिवेशनानतर महामंडळ सभा घेण्याचा मान शिक्षक नेते मा.सिद्धेश्वर पुस्तकेयांना मिळालात्याच्या झुंजार आणि कर्तबगार नेतृत्वाखाली ऐतिहासिक सातारानगरीत यशस्वीपणे पार पडली.या महामंडळसभेस राज्याच्या कानाकोपर्यातुन संघटनेचे बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी अधिवेशनातील कामकाजाचा आढावा घेतला.शिक्षकांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी करत असलेल्या कार्याचा आढावा सादर केला.पेन्शन ,7 वा वेतन आयोग शिक्षक बदली धोरण आदी प्रश्नावर संघटनेची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिक्षक संघाचे मुकुंद सुर्यवंशी, सुनिल गुरव, ,महेंद्र अवघडे,तानाजी ढमाळ,राजेंद्र बागल,सुनील सावंत, बाळासाहेब साळुंखे,संजय शेजवळ, मोहन निकम,रुपेश जाधव,भगवान , धायगुडे,चंद्रकांत आखाडे,शंकर जांभळे,गणेश तोडकर,अनिल शिंदे,राजाराम खाडे,राजकुमार जाधव,बंडोबा शिंदे, दत्तात्रय कोरडे, हिम्मत जगताप, सुरेंद्र जेधे,महेंद्र इथापे,लालासो भंडलकर,संतोष कदम, शाम पवार,तात्या सावंत, सुनील खंडाईत ,सुरेंद्र भिलारे,बजरंग वाघ, सुरज तुपे, सुभाष नरळे,संतोष जगताप,संतोष् निंबाळकर,अनिल जायकर,व राज्य ,जिल्हा ,तालुका पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थिती होते. याप्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक मोहनराव निकम यांनी अण्णांच्या शुभेच्छावर कल्पक कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मच्छिंद्र ढमाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हानेते सुरेश गायकवाड यांनी केले तर आभार महेंद्र जानुगडे यांनी मानले.