सातारा : 6 एप्रिल ते 16 अखेर शिंगणापूर चैत्रीवार्षिक यात्रा होणार आहे. उन्हाळी हंगाम सुरु झाला असून परिसरात पाण्याची उपलब्धता नसल्याने शिंगणापूर यात्रेला टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे यात्रा काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन यात्रा शांततेने पार पाडण्याचे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासन यंत्रणेच्यावतीने केले.
यात्रा नियोजन बैठक केवळ प्रशासकीय देखावा सरपंच अभय मेंनकुदळे अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाची यात्रा 10 ते 19 एप्रिल अखेर आहे. चैत्रीमोठया यात्रेचे नियोजन प्रशासकीय स्तरावरून प्रांताधिकारी यांच्या अध्यदेशानुसार होत असते. श्रीक्षेत्र पंढरपूर, शिर्डी, आळंदी, जेजूरी, तुळजापूर या मोठया तिर्थक्षेत्राप्रमाणेच शिखरशिंगणापूर यात्रा मोठयाप्रमाणात भरते. राज्यातील सर्व कानाकोपऱयातून लाखोंभाविकांचा लोंढा याठिकाणी येत असतो. त्यासाठीच प्रशासकीय स्तरावरून नियोजन बैठक आयोजित केली जाते. मात्र याचे गांभीर्य नसल्याची खंत शिंगणापूर सरपंच अभय मेंनकुदळे, पुरंदर सभापती बबनराव कामथे, कावडी मानकरी तेलिभुतोजीबुवा, खळदकर महाराज, भाळवणी मांगमाळी कवडीचे मानकरी लोखंडे, धजमानकरी पाटील, होळकर काळकवडे आदींनी तरुण भारतफ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच यात्रेच्या नियोजनासाठी बैठकी बोलवण्यात आली होती. यात्रेच्या नियोजन बैठकीस प्रांताधिकारी दादासो कांबळे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी शेलार, पोलीस अधिकारी चव्हाण, चंद्रकात खाडे, आरोग्य विभाग डॉ. तांबोळी, माळशिरस तहसीलदार अभिजीत पाटील, नातेपुते पोलीसाधिकारी भुजबळ, एसटी परिवहन मंडळाच्या श्रीमती खाडे, शिंगणापूर सरपंच अभय मेंनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, ग्रामसेवक एम. डी. जाधव, देवस्थानचे मोहन बडवे, पोलीस पाटील संतोष बोराटे, मोहनराव भोसले, दगडू ठोंबरे, वीरभद्र कवडे, प्रकाश कुंभार, अरुण बडवे, दादा शिंगाडे, बहुसंख्य ग्रामस्थ, सर्व धज व कावडीधारक मानकरी उपस्थित होते. शिंगणापूर सरपंचानी उपस्थितांचे स्वागत केले.
अधिकारी बैठकीस उपस्थित नसतात
याबाबत सरपंचांनी दिलेली माहिती अशी, शिंगणापूर ग्रामपंचायत यात्रा भरविण्यात पत सक्षम नाही, कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायतीला उत्पन्न नाही. पिण्यासह विविध सुविधा भाविकांना पुरवाव्या लागतात. यासाठी नियोजन बैठकीत सविस्तर चर्चा होत असते, त्यातील त्रुटी अथवा उपाययोजनांसाठी निर्णय घेणारे सक्षमाधिकारी याबैठकीस उपस्थित रहात नाहीत. यापुढे प्रांताधिकाऱयांना व जबाबदार अधिकाऱयांना पुरेसा वेळ असेल तेव्हाच यात्रा नियोजन बैठक घ्यावी, असे शिंगणापूर सरपंच व मानकऱयांनी भावना व्यक्त केली. जवळपास 50 हून मानकरी दूरवरून बैठकीसाठी तहसील पत्र निमंत्रणानुसार येतात. त्यांचा वेळ व प्रवास खर्च नाहक होत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. यात्रा नियोजन बैठकीस पुरेसा वेळ असेल तेव्हाच बैठक बोलवावी, अन्यथा केवळ नियोजन बैठकीचा देखावा नको. यापुढे प्रशासनने योग्य सहकार्य केले, तरच यात्रा भरविणार अन्यथा यात्रा भरणार नसल्याचे शिंगणापूर ग्रामपंचायत जाहीर करणार असल्याचे लेखी निवेदन सरपंचांनी सर्व कार्यालयात दिले असल्याचे सांगितले.
प्रशासनाकडून योग्य नियोजन सुरु
यावेळी प्रांताधिकारी म्हणाल्या, पारंपरिक प्रथेप्रमाणे प्रत्येक दिवशी विविध उसत्व होत असतात, यात्रा कालावधीमध्ये यात्रेकरूंना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य प्रकारे नियोजन करण्यात येते. प्रामुख्याने उन्हाळी हंगाम व दुष्काळजन्य परिस्तिथीमुळे पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असून यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. तरी सर्व मानकरी व कवडीधारकांनी आपल्या समवेत येणाऱया भविक व यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय करावी. आपले टँकर सोबत घेऊन यावेत, याशिवाय प्रशासनाचे 20, कारखान्याचे 10, सहकारी संस्थाचे 5, एकून 35 टँकरद्वारे धर्मपुरी हद्दीतील पाणी साठवण तलावातून शिंगणापूर यात्रेस पाणी पुरवठा केला जाणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे होमगार्ड, पोलीस फौजफाटा, आरोग्य पथके यात्रेपूर्वीची व नंतरची स्वच्छता, भविकभक्तांचे अभिषेक, देवदर्शन आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विजपुरवठा खंडित होऊ नये, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, पोलीस यंत्रणा त्रयोदशी अखेर राहावी, व्यवसाईकांनी आपली दुकाने वाहतुकीस अडथळा होणार नाहीत अशी उभारावीत, एसटीने रोडवर प्रवासी भरू नयेत, यात्रा परिसरात अवैधधंद्यांना बंदी करण्याची मागणी भाविकांनी केली. यानंतरची बैठक जिह्यधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.
शिंगणापूर यात्रेला केला जाणार टँकरने पाणी पुरवठा
RELATED ARTICLES