Tuesday, February 24, 2026
Homeठळक घडामोडीछ. शिवाजी महाराज आधुनिक काळातील मॅनेजमेंट गूरू:कुलगुरू डॉ. शिंदे

छ. शिवाजी महाराज आधुनिक काळातील मॅनेजमेंट गूरू:कुलगुरू डॉ. शिंदे

वाई : छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक काळातील देखील मॅनेजमेंट गुरू आहेत. त्यांनी केलेल्या युद्धाचां इतिहास पाहता आजही त्याचे कशा रीतीने प्लनिंग केले असेल याचे आश्चर्य वाटते. तेही त्याकाळी आजच्या सारखी मोबाईल, इटरनेट, जीपीएस फेसबुक, वॉट्सप, ईमेल अशी कोणतीही साधने नसताना अचूक अंदाज बांधले गेले. हे अत्यंत कुशलतेने केलेले प्लॅनिंग होते. हे सर्व आपल्याला शिकलेच पाहिजे, असे उदगार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे काढले.
शिवाजी विद्यापीठ व किसनवीर महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायरेश्वर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ल्यावर वृक्षारोपण केले. शिवाजी महाराजांच्या जीवनपट उलगडून सांगताना डॉ.शिंदे यांनी छत्रपतींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. एक आदर्श राजा व आदर्श शासन कसे असते हे सांगितले. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना कोणत्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे याची मांडणी केली. यावेळी विद्यापीठातील कुलगुरूचे शैक्षणिक सल्लागार माजी प्राचार्य डॉ. डी.आर.मोरे, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. डी. के. गायकवाड. एन.एस.एस फिल्ड कोऑरडीनेटर प्रा.संग्राम मोरे, विद्यापीठाचे स्पोर्ट्स डायरेक्टर गायकवाड, सिनेट सदस्य अँड. जगदीश पाटणे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ चंद्रशेखर येवले यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यापीठाने गडावर शिबिराचे आयोजन करण्यास परवानगी दिल्या बद्दल आभार मानले.
विद्यापीठाने मागील वर्षी पासून , शिवपरीक्रमा गडकोट किल्ल्यांची, हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गेल्यावर्षी ,पन्हाळा ते पावन खिंड, तसेच रायगड परिक्रमा असे उपक्रम गड संवर्धन अंतर्गत घेण्यात आले. यावर्षी या मोहिमेची सुरवात किल्ले रायरेश्वर येथून करण्यात आली. यामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयातील 150 विद्यार्थी रायरेश्वर येथील निवासी शिबिरास उपस्थित होते. तीन दिवसाच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी किल्ले रायरेश्वर येथील शिवकालीन दोन पाझर तळातील गाळ काढला तसेच गावक-यांना किल्ल्यावर जाण्यासाठीचा रस्ता तयार करण्यास मदत केली. याशिवाय शंभू महादेव मंदिर परिसरातील स्वछता केली.
या शिबिराचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेते मल्ल व पुणे ग्रामीणचे डी.वाय.एस.पी विजय चौधरी उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडून दाखविला कठोर परिश्रम व जिद्द या दोन गोष्टींचे जीवनातील महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना संगितले. विद्यार्थ्यांनी आधुनिक काळात मोबाईल व इंटरनेटचां वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले. शेवटच्या दिवशी पुण्यातील गिनीज बुक रेकॉर्ड असलेली आंतरराष्ट्रीय कीर्तीची सायकल पट्टू कु. वेदांगी कुळकर्णी हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तिने तिच्या जीवनातील आलेल्या आडचणी कशा दूर केल्या व यश संपादन केले ते विशद केले.
या शिबिराचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.आनंद घोरपडे, प्रा. समीर पवार, प्रा. अरिफा शेख, प्रा.प्रियांका चव्हाण, प्रा प्राजक्ता पवार, प्रा. डॉ. राजेश गावित, प्रा.रोहिणी भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी राज भगत व सायली चिकणे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular