म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने):- म्हासूर्णे ता.खटाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली श्रावण महिन्यात समई तेवत ठेण्याची परंपरा आजही तेवढ्याच भक्ती भावाने जोपासली जात आहे यंदा या परंपरेत वाढ झाली असून 61 समई श्रावण महिन्याच्या सुरवाती पासून तेवत ठेवण्यात आल्या आहेत त्यासाठी लागणारे गोडेतेल भाविक मंदिराचे पुजारी यांच्याकडे सुपूर्त करतात आणि त्यानंतर अखंड दिवस रात्र या समई तेवत ठेवण्यासाठी पुजारी काळजी घेतात या काळात मंदिरात दररोज आध्यात्मिक कार्यक्रम सुरु असतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाआरतीचे आयोजन गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या आरतीला गावातील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देवुन कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील व गावातील उद्योजक विनायक औंधे यांच्या हस्ते महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.महाआरतीस प्रारंभ होण्यापुर्वी म्हासुर्णे गावच्या वतीने आमदार बाळासाहेब पाटील यांचा सत्कार सरपंच सचिन माने यांच्या हस्ते करण्यात आला.व महाआरतीस सुरूवात झाली.महाआरतीला म्हासुर्णे गावातील महिला ,ग्रामस्थ,युवक,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी म्हासुर्णे गावातील माऊली मंदिर,भैरवनाथ मंदिर,मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिरात जावुन दर्शन घेतले व म्हासुर्णे गावातील सर्व ग्रामस्थांच्या बरोबर सखोल अशा पद्धतीने चर्चा करण्यात आली.ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या.या महाआरतीला सह्याद्री साखरकारखान्याचे संजय जगदाळे,संजय थोरात,म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने,शिक्षण संस्थेचे चेअरमन महादेव माने,उपसरपंच सुहास माने,सेक्रेटरी राजाराम माने,चेअरमन दादासो कदम,भैरवनाथ चेअरमन अशोक माने,प्रा.ज्ञानेश्वर माने,ऐ.आर.दबडे,पांडुरंग माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,गुलाब वायदंडे,गोरख माने,सिकंदर मुल्ला,आबा यमगर,हेमंत कुलकर्णी,समाधान थोरात,चंद्रकांत माने,रामचंद्र माने,संगिता गुरव,सिताबाई माने,एम.पी.माने,उद्योजक पोपट माने,युवा नेते सचिन शिंदे,प्रदिप माने,सोसायटी संचालक अधिक माने,शहाजी माने,मारुती माने,श्रीरंग माने,आलम मुल्ला,तसेच गावातील मोठ्या प्रमाणात महिला,ग्रामस्थ,युवक,भक्तगण उपस्थित होते
म्हासुर्णेतील महादेव मंदिरामध्ये हेमांडपंथ्थी महादेव मंदिरातील समई प्रज्वलनाची परंपरा हि आमच्या पुर्वजांनी दिलेली आध्यात्मिक ठेव आहे.शेकडो वर्षापूर्वी चालु केलेली हि परंपरा जोपासताना एक वेगळाच आनंद मिळतो.गावातील लहान थोर गरिब श्रीमंत भाविक भक्त यामध्ये सहभागी होतात.
प्राध्यापक
श्री.ज्ञानेश्वर माने (सर)