सातारा ःश्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुंबई येथील सुप्रसिध्द गायिका सौ.मृणाल नाटेकर व नांदेड येथील अभिजीत अपस्तंभ यांनी गायन सेवा समर्थ चरणी अर्पण करुन या महोत्सवास आरंभ केला.
पूर्वार्धात पं.राम मराठे यांची नात व पं.प्रदीप नाटेकर यांची शिष्या तसेच संगीत सुरमणी पुरस्कार विजेत्या आकाशवाणी व दूरदर्शन चे टॉप ग्रेडच्या कलाकार सौ. मृणाल नाटेकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनाची सुरुवात शामकल्याण रागाने करत यात ..मंगल नाम श्री गणेश..ही बंदिश आणि ..आज मोरी लाज राख लिजो..ही आणखी एक बंदिश सादर करुन त्यानंतर भजन संध्येत ..मान पुजाये मेरी यमुना नंद के कान्हा.. सादर केले.विठुरायाची आळवणी असणारे.. रुप पाहता लोचन.. सादर करुन ..पदमनाभा नारायणा.. सादर करत .. सोडूनी राउळाला मध्यान्ह रातीला गणिका म्हणाल्या, पांडुरंग आला ..हा अभंग सादर करुन ..परब्रह्म निष्काम तोहा गवळीया घरी.. या भजनाने आपल्या गायनाची सांगता केली. सौ.नाटेकर यांना तबल्यावर साथ पद्मश्री पं.विजय घाटे यांचे शिष्य अभिषेक पटोकार व संवादिनीवर साथ पं.प्रमोद मराठे यांचे शिष्य अभिषेक सीनकर यांनी केली.
उत्तरार्धात नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते व संगीतात एम.ए.बी.एड केेलेले अभिजीत अपस्तंभ यांना त्यांचे वडील गुरु रत्नाकर अपस्तंभ,श्रीमती सीता राव,पं.देशपांडे,पं.राजा काळे,पद्मश्री अजय चक्रवर्ती,पं.उल्हास कशाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.अभिजीत यांनी आपल्या कार्यंक्रमाची सुरुवात मधुकंस रागाने केली. यात .. गुरुदेव कृपा करो निशी दिन..ही बंदिश सादर केल्यावर विविध संतांचे अभंग व नाट्यगीते सादर केली. यात गीत रामायणातील .. स्वये श्री रामप्रभू ऐकती .. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.. कानडा राजा पंढरी..,विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म..या सारखी अनेक सुंदर गीते सादर करुन आपल्या कार्यक्रमाची सांगता ..कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर.. या भैरवीने केली.
अभिजीत अपस्तंभ यांना तबल्यावर साथ अभिषेक पटोकार व संवादिनीवर साथ पं. प्रमोद मराठे यांचे शिष्य अभिषेक सीनकर यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समर्थ भक्त अजेय देशपांडे व रमेशबुवा शेंबेकर यांनी केले.
यानंतर समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार रमेशबुवा शेंबेकर,रसिका ताम्हणकर यांनी रामनामी,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी समर्थं भक्त अरविंदबुवा रामदासी,योगेश बुवा रामदासी गोविंदराव बेडेकर यांचेसह संपुर्णं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश परदेशातुन आलेले शेकडो समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या दि.3फेब्रुवारी रोजी सौ.अपर्णा गुरव यांचे गायन होणार असुन त्यांना संगीत साथ मिलींद गुरव, प्रणव गुरव व संवादिीन साथ स्वानंद कुलकर्णी हे करणार आहेत.
सौ. मृणाल नाटेकर-भिडे आणि अभिजीत अपस्तंभ यांच्या गायनाने दासनवमी संगीत महोत्सवाची सुरुवात ; श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित दासनवमी संगीत महोत्सव 2018
RELATED ARTICLES