कराडः यशवंतनगर (ता. कराड) सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यशवंतनगर येथील तिस-या बॅचच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील (बाबा), कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव बच्चे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात तसेच विविध क्रिडा संघातून राज्य आणि देश पातळीवर सहभाग घेत आणि विद्यापीठाच्या अविष्कार, अङ्घामेध, युथ चॅम्पिअनशिप सारख्या विभागातही राज्य आणि देश पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून महाविद्यालयाचा नावलौकीक वाढविला आहे. आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची घौडदौड यशस्वीपणे चालू आहे. यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी आणि 12 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत असे सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालकसाो मा. आबासाहेब पाटील यांनी सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय हे राज्यात एक आदर्श महाविद्यालय म्हणून ओळखले जावे यासाठी महाविद्यालय व प्रशासन आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर येणा-या काळात देखील महाविद्यालय व प्रशासन सदैव तुमच्या सेवेत राहील अशी ग्वाही बोलताना दिली.
यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी एम. ए. पाटील, डिस्टलरी इनचार्ज डि. जे. जाधव, प्रा. एस. पी. जाधव तसेच विद्यार्थी संकेत चव्हाण, ऐश्वर्या शिंदे, विराज पाटील, प्रतिक्षा कदम, वनिता आढाव, विरेंद्र संकपाळ, किरण बुर्ले, शुभम पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर पी. आर. यादव, शेती अधिकारी एम. ए. पाटील, सिव्हील इंजिनिअर वाय. जे. खंडागळे, लेबर ऑफिसर एन. आर. जाधव, डिस्टीलरी इनचार्ज डी. जे. जाधव, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, पर्यावरण इंजिनिअर एच. जे. माने, वाहन विभाग प्रमुख व्ही. बी. क्षीरसागर, इरिगेशन संपर्क प्रमुख आर. जी. तांबे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. निकम यांनी केले व आभार प्रा. पी. टी. बानुगडे यांनी केले.
सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा
RELATED ARTICLES