साताराः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यानी प्रतिकुलतेवर मात करत 10वी च्या सी.बी.एस.ई नवी दिल्लीच्या बोर्डाच्या परिक्षेत गौरीशंकरच्या डॉ.पी.व्ही.सुखात्मे स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यानी मिळविलेले उज्वल यश कैतुकास्पद असल्याचे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब येथे डॉ पी.व्ही सुखात्मे स्कूल लिंब येथे आयोजित केलेल्या गुणवंत्त विद्यार्थ्याच्या सत्कार समारभात बोलत होते यावेळी स्कूलच्या प्राचार्या डॉ.नवनिता पटेल घनशाम चव्हाण उज्वला सांवत अनिता घाडगे .अंजना गोसावी अदिची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले दर्जात्मकतेची कास धरुन या स्कूलने नेहमीच विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढसाठी परिश्रम घेतले आहेत त्यामुळेच संलग सातव्यादा 100 टक्के निकालाची किमया साधता आली आहे या प्रसंगी डॉ.प्राचार्या नवनिता पटेल म्हणाल्या की विद्यार्थी केंद्रबिद्र ठेवून त्याची जडण घडण घडविणे हे आमचे ध्येय ठेवून केलेल्या वाटचालीमुळेच स्कूला उत्तुंग यश प्राप्त झाले आहे सी.बी.एस.ई नवी दिल्लीच्या बोर्डाच्या गुणवंत्तेत चमकदार कामगिरी केल्यामुळे स्कूलाचा नावलैकीक विद्यार्थ्यानी वाढविला आहे प्रारंभी गुणवंत्ता प्राप्त श्रेया सांळुखे करिष्मा चौरासिया व इतर विद्यार्थ्याचा बुके देवून सत्कार करण्यात आला प्रास्तविक व आभार डॉ.नवनिता पटेल यांनी मानले.
गौरीशंंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यानी गुणवत्ता मिळविलेले यश कौतुकास्पदःश्रीरंग काटेकर
RELATED ARTICLES