भुईंजः आज देशात औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करित असताना हा सप्ताह नुसता साजरा न करता तो प्रत्येक कामगाराने आत्मसात करणे गरजेचे आहे. कामगारांनी काम करित असताना सुरक्षेचे सर्व नियम पाळीत संभाव्य अपघात टाळावेत, असे आवाहन किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी केले.
किसन वीर व किसन वीर-प्रतापगड साखर कारखान्यावर 48 व्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, चंद्रसेन शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव व किसन वीर-प्रतापगडचे कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद यांची प्रमुख उपस्थिती होती.
गजानन बाबर पुढे म्हणाले, कारखान्यात काम करित असतानासुरक्षेचे नियम पाळणे गरजचेे असुन कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने किसन वीर कारखान्याचेे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी मुबलक प्रमाणात सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. त्याचा सुयोग्य वापर सर्व कामगार बांधवानी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम म्हणाले, कारखान्यातील विविध मशिनचा वापर करीत असताना कामगारांनी सजगतेने काम करणे गरजेचेे आहे. कामगारांनी स्वत: काळजी घेतल्यास संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे. यावेळी एच.आर.मॅनेजर ए. टी. शिंगटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालक नंदकुमार निकम यांनी सुरक्षा सप्ताहाची प्रतिज्ञा वाचन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे सेफ्टी ऑफीसर सचिन शिंदे यांनी केले. यावेळी इन्चार्ज सेक्रटरी एन. एन. काळोखे, चीफ इंजिनियर आर. बी. जगदाळे, प्रतापगड कारखान्याचे चीफ इंजिनिअर वसंत कांबळे, चीफ केमिस्ट विकास गाढवे,इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, इन्चार्ज अॅग्री मॅनेजर विठ्ठल कदम, असि. इंजिनियर ए. बी. फडतरे, सुरक्षा अधिकारी एस.एम.बर्गे, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस यांच्यासह कारखान्याचे विविध विभागाचे खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा न करता आत्मसात करावाः गजानन बाबर
RELATED ARTICLES